नाशिक : शेती हे एकमेव क्षेत्र असे आहे जेथे उत्पादकांना त्यांच्या मालाची किंमत ठरविण्याचा अधिकार नाही. भारतात अजूनही शेतीशी संबंधित धोरणे ग्राहककेंद्री आहेत, जी शेतीव्यवस्थेला मारक ठरत आहेत, असे मत ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फळे, भाजीपाल्याचे उत्पादन, प्रक्रिया आणि विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांनी स्थापन केलेल्या येथील सह्य़ाद्री फार्मर्स प्रोडय़ुसर कंपनीची नववी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी झाली. यावेळी ‘शेती आणि अर्थव्यवस्था- काय हवे, काय नको?’ या विषयावर कुबेर यांनी मोठय़ा संख्येने उपस्थित शेतकरी सभासदांशी संवाद साधला.

Web Title: Agricultural sector suffering due to customer centric policy instead of production zws
First published on: 27-09-2019 at 03:03 IST