मी काही दिवसांपूर्वीच विदर्भात जाऊन आले. तेथील परिस्थिती पाहता सरकारने या भागाकडे जरा जास्त लक्ष देण्याची गरज आहे असे मला वाटते. मोदी सरकारने आपल्याला बरीच आश्वासने दिली आहे आणि ती हळूहळू पूर्णदेखील होत आहेत. सर्वच आश्वासन एकाच वेळी पूर्ण नाही होऊ शकत. त्यामुळे आपण सर्वांनीच सरकारला थोडा वेळ देण्याची गरज आहे. इतक्या वर्षांनी भाजप सत्तेवर आले आहे, तर ते नक्कीच काहीतरी करून दाखवतील यावर माझा विश्वास आहे. त्यासाठी संपूर्ण देशाने थोडा धीर धरून सरकारला वेळ द्यायला हवा.
मी दहावर्षांपूर्वी गुजरातमधून मुंबईला आले. दहा वर्षात मोदींजींनी गुजरातचा कायापालट केला आहे. गुजरात हे विकसित शहर झाले असून तेथील जनतेला चांगल्या रोजगारसंधी उपलब्ध झाल्या आहेत. तसेच चांगले बदल आपल्या देशातही होतील.
मी एक अभिनेत्री असले तरी त्याआधी एक सामान्य नागरिक आहे. त्यामुळे बजेटनुसार जमेल तितके आर्थिक नियोजन करण्याचा मी प्रयत्न करते.