भारत बदलत असला तरी येथील कुटुंबसंस्था आजही अभंग आहे. पूर्वीचे मोठय़ा एकत्र कुटुंबाचे अलीकडे छोटय़ा-छोटय़ा अनेक कुटुंबांत विभाजने झाली असली तरी हे खरेच आहे. छोटय़ा कुटुंबातील सदस्य तुलनेने कमी असले तरी एकाच कर्त्यां व्यक्तीवर या कुटुंबाचा भार येतो. अधिक चांगले जीवनमान, मुलांसाठी चांगले शिक्षण व राहणीमान, त्यांचे उच्च शिक्षण व तत्सम अनेक आर्थिक उद्दिष्टांसाठी कुटुंबातील कर्ता झटत असतो. त्याचे/तिचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्नरत असतो. शहरी जीवनाच्या धकाधकीला सामोरे जाताना, येथील अनिश्चितता, अकल्पित जोखमींचा तो पदोपदी सामना करीत असतो. यातून काही अनावस्था प्रसंग घडला तर कुटुंबावरील तो गहिरा आघात ठरतो. कर्त्यांच्या पश्चात त्याच्या कुटुंबाला हलाखीच नव्हे, तर कैक प्रसंगी उपजीविकेसारखी मूलभूत गोष्टही दुरापास्त बनल्याचे आपल्याला दिसले आहे. या स्थितीवर तोडगा म्हणून आयुर्विम्याची प्रमुख भूमिका आहे. दुर्दैवाने अशा अकल्पित आघाताची स्थिती ओढवल्यावरच त्याचे महत्त्व अनेकांना लक्षात येते. तर दुसरीकडे पगारदार व्यक्ती कर बचत साधणारे एक साधन म्हणून आयुर्विम्याकडे पाहतात, तेही अगदी शेवटच्या क्षणी शेवटचा पर्याय म्हणून. करपात्र उत्पन्न व करदायित्व यांचे गणित जुळवून, घाईघाईने तेवढय़ा रकमेपुरताच विमा खरेदी करण्याचा प्रघात सर्रास आढळून येतो. हा दृष्टिकोन चुकीचा आणि आवश्यक संरक्षण मिळविण्याऐवजी नाहक आर्थिक नुकसान ओढवून घेणाराही आहे. म्हणूनच तांत्रिक अर्थाने जीवन विमा म्हणजे काय, तो कुणी का व किती प्रमाणात घ्यावा हे समजून घेऊन, त्या संबंधाने सजगपणे समंजस निर्णय घ्यायला हवा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्याची ही काही मार्गदर्शक तत्त्वे:

Web Title: 5 things to remember before buying a life insurance policy
First published on: 08-05-2017 at 01:05 IST