ऑक्टोबर महिन्याच्या औद्योगिक उत्पादनाच्या आकडय़ाने अर्थजगतास चकीत केले. ही वाढ मुख्यत्त्वे दिवाळीच्या दिवसातील वाढीव मागणीच्या अपेक्षेने वाढलेल्या उत्पादनांमुळे आहे. या आधी या स्तंभात सांगितल्याप्रमाणे अर्थव्यवस्थेला गती मिळण्यपूर्वी पोलादी पत्रे, तेल शुद्धीकरण, कोळसा यांचे उत्पादन वाढणे गरजेचे होते. म्हणून अर्थव्यवस्थेची दिशा बदलली, असा कयास काढता येईल. महागाईचे आकडे हे इंधनाच्या दरवाढीमुळे चढेच राहतील, असा अंदाज व्यक्त केला होता. आता बाजाराची नजर आहे ती कंपन्यांनी भरलेल्या प्राप्तीकराच्या तिसऱ्या अग्रीम हप्त्यांच्या आकडय़ावर. आज, सोमवारी दिवसभरात कोणी किती कर भरला हे जाहीर होईल. उद्या रिझव्र्ह बँक आपल्या मध्य तिमाही धोरणाचा पतआढावा घेईल. मुख्य व्याजदरात बदल संभवत नाही. रोख राखीव प्रमाणात पाव टक्क्याची कपात होऊ शकते. शेअर बाजाराची या आठवडय़ातील वाटचाल याच दोन गोष्टींवर ठरेल.
भारतात खाद्य व्यवसायाची विभागणी दोन मुख्य गटात भागात होते. पहिला असंघटीतरित्या चालणारा व दुसरा प्रकार म्हणजे संघटीतरित्या चालणारा. या दोन प्रकारात तीन ते चार उपप्रकारही आहेत.
पहिल्या भागात रस्त्यावर उभे राहून खाद्यपदार्थ विकणारे. यात मुंबईतल्या छबिलदासच्या वडापावपासून पुण्याच्या बाजीराव रस्त्यावरच्या कल्पना भेळेपर्यंत स्थानिक विक्रेते येतात. यामध्ये घरून डब्यांचा व्यवसाय करणारे, कोकणातल्या पर्यटकांना स्थानिक पदार्थ खाऊ घालणाऱ्या खानावळी इत्यादींचा समावेश होतो. संघटीतरित्या चालणाऱ्यामध्ये फूडकोर्ट, क्विक सव्र्हिस रेस्टॉरन्ट्स, कॉफी कॅफे डे आणि बरिस्तासारखी कॉफीशॉप यासारख्या खाण्या-पिण्याच्या व्यवसायात असलेल्या विक्री साखळ्यांचा समावेश होतो. एकूण वार्षकि रु. ९,००० कोटींची उलाढाल असलेला हा व्यवसाय गेली पाच वष्रे ३८% दराने वाढत आहे. परंतु आर्थिक मंदीचा सर्वात जास्त फटका या उद्योगास बसला असून २०१२ मध्ये हा उद्योग २५%ने वाढणे अपेक्षित आहे. अशाच उपहारगृहाची साखळी चालविणाऱ्या ‘स्पेशालिटी रेस्टॉरन्टस् लिमिटेड’ या कंपनीची ओळख करून घेऊ.
या कंपनीची स्थापना मुंबईत १९९२ मध्ये ‘ओन्ली फिश’ या उपाहारगृहाच्या सुरुवातीसह झाली. १९९५ मध्ये मुंबईत साकीनाका येथे ‘मेनलॅण्ड चायना’ या नाममुद्रेच्या साखळीतील पहिले उपहारगृह सुरु झाले. ही कंपनी एकूण ११ नाममुद्रांखाली आपली उपहारगृहे चालवते त्यापकी ‘ओह कलकत्ता’ व ‘मेनलॅण्ड चायना’ या मुख्य नाममुद्रा आहेत. ही कंपनी भारतातील २५ शहरांत व बांग्लादेशातील एका शहरात अशी मिळून ९० उपहारगृहे चालवते.
२८ ते ३६ वयोगटातील सुस्थितीतील तरुणाई हा या व्यवसायाचा पाया असून, बदलत्या खाण्याची सवयी, सुस्थितील नोकरी करणाऱ्या महिला, वाढते शहरीकरण, हातात उरणारा अतिरिक्त उरणारे पसा (ऊ्र२स्र्२ीुं’ी कल्लूेी), नवनवीन पदार्थ चाखण्याची हौस, गरज व चन यातील कमी होणारे अंतर यासारख्या गोष्टी या व्यवसायाच्या वृद्धीस कारणीभूत आहेत. या कंपनीने विस्ताराच्या मोठय़ा योजना आखल्या असून येत्या तीन वर्षांत वर्षांला १५ उपाहारगृहे उघडण्याच्या योजना असून साखळी उपाहारगृहांच्या व्यवसायात ४५% दरम्यान असलेला हिस्सा या विस्तारानंतर ५८ ते ६०% दरम्यान जाणे अपेक्षित आहे. विस्ताराच्या या दुसऱ्या टप्प्यात दुर्गापूर, गुवाहटी, लुधियाना, भुवनेश्वर, यासारख्या मध्यम शहरात उपहारगृहे उघडणार आहे. कंपनीने रु. १,८०० कोटी प्राथमिक भागविक्रीमार्फत उभारले असून हे टप्प्याटप्याने उपाहारगृहे उघडण्यासाठी वापरण्यात येणार आहेत. ग्राहकाभिमुख व्यवसायाच्या दृष्टीने ‘रु. ६७८’ ही योजना राबवित आहे. सर्व करांसहित या किंमतीत सोमवार ते शनिवार ‘बुफे’ देण्यात येतो. भेट देण्यासाठी ‘गिफ्ट व्हाऊचर’, ‘डाईन नाइन’ (रात्री ९ पूर्वी जेवल्यास विशेष सुट), बदलत्या मॉल संसकृतीत ही उपाहारगृहे आठवडय़ाचे सातही दिवस सुरू ठेवण्यात येतात. निवडक ठिकाणी सकाळी न्याहारीचे पदार्थ देण्यात येत आहेत. या गोष्टींमुळे या उपाहारगृहात मोठय़ा संख्येने ग्राहक ओढण्यात ही कंपनी यशस्वी झाली आहे. गेल्या आíथक वर्षांत विक्री २९% वाढविण्यात कंपनी यशस्वी झाली आहे. कंपनीची ८०% उपाहारगृहे स्वत:ची तर २०% फ्रेंचांयझी तत्त्वावर चालते.
यातील गुंतवणुकीच्या काही जोखीमी बाजू आता पाहू. कंपनीच्या ११ नाममुद्रा असल्या तरी ‘मेनलॅण्ड चायना’ व ‘ओह कलकत्ता’ या दोन नाममुद्रामधून ८०% विक्री होते. या व्यवसायाचा कच्चा माल अन्नधान्य हा असल्यामुळे त्याच्या किंमती सतत बदलत असतात. त्यानुसार नफ्याची पातळीही सतत बदलते. उपाहारगृहाचे दरपत्रक मात्र वारंवार बदलता येत नाही. उपाहारगृह नफ्यात येण्यास तीन ते चार वर्षांचा कालावधी जावा लागतो. कंपनीला स्थानिक उपहारगृहांच्या साखळीकडून वाढत्या स्पध्रेला तोंड द्यावे लागत आहे. हा व्यवसाय ‘चैन’ या प्रकारात मोडत असल्यामुळे आíथक आवर्तनाचा परिणाम सर्वप्रथम या व्यवसायास जाणवतो. चालू आíथक वर्षांत कंपनी प्राथमिक विक्रीमधून उभारलेल्या पशातून कर्ज फेडणे अपेक्षित आहे. २०१३ या आíथक वर्षांत प्रती समभाग उत्सर्जन रु. ५.५० तर २०१४ मध्ये रु. ९.८० येण्याची शक्यता आहे. या कंपनीत प्रवर्तकांचा वाटा ६१% आहे. कंपनीच्या संचालक मंडळात दोन कार्यकारी व पाच बिगर कार्यकारी संचालकांच असून सुसिम दत्ता, दुष्यंत मेहता, विशाल सूद यांच्यासारख्या नामांकित व्यक्ती संचालक मंडळात असणे, हे उद्यम व्यवस्थापनाच्या दृष्टीचे द्योतक आहे.
बाजारपेठा ख्रिसमससह नवीन वर्षांच्या स्वागताला सजल्या आहेत. येत्या सोमवारी याच दिवसांशी ‘नाते’ सांगणारी एक कंपनी टिळकनगर इंडस्ट्रीज घेऊन येणार आहे. तेव्हा भेटूया ख्रिसमस साजरा करायला येत्या सोमवारीच..
स्पेशालिटी रेस्टॉरन्ट्स
दर्शनी मूल्य : रु. १०
मागील बंद भाव : रु. १६८.८५ (१४ डिसेंबर)
वर्षांतील उच्चांक : रु. २२७
वर्षांतील नीचांक : रु. १५३
वर्षांनंतर अपेक्षित भाव : रु. २३०