करदात्याने आर्थिक वर्षांत केलेल्या व्यवहारांची म्हणजेच उत्पन्न, तोटा, वजावटी, उत्पन्नावर भरावा लागणारा कर, कर परतावा (रिफंड), वगैरेंची माहिती विवरणपत्राद्वारे प्राप्तिकर खात्याकडे दरवर्षी दाखल करावी लागते. विवरणपत्र दाखल करणे कोणाला बंधनकारक आहे याबद्दल काही निकष आहेत. विवरणपत्र दाखल करणाऱ्यांच्या संख्येत वाढ करण्यासाठी प्राप्तिकर कायद्यात मागील काही वर्षांत बदल करण्यात आलेले आहेत. साधारणत: ज्या व्यक्तींचे उत्पन्न कमाल करमुक्त मर्यादेपेक्षा जास्त आहे अशांना विवरणपत्र भरणे बंधनकारक तर आहेच. शिवाय काही ठरावीक रकमेपेक्षा जास्त खर्च केल्यास आणि उत्पन्न या मर्यादेपेक्षा कमी असेल तरी विवरणपत्र भरणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. जे करदाते विवरणपत्र दाखल करीत नाहीत त्यांचा उद्गम कर (टीडीएस) किंवा गोळा केलेला कर (टीसीएस) जास्त दराने कापण्याची तरतूददेखील १ जुलै २०२१ पासून अस्तित्वात आली आहे, जेणेकरून कराचे अनुपालन करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्या वैयक्तिक किंवा हिंदू अविभक्त कुटुंबांचे एकूण उत्पन्न कमाल करमुक्त मर्यादेपेक्षा जास्त आहे अशांना विवरणपत्र भरणे बंधनकारक आहे. कमाल करमुक्त मर्यादा खाली दर्शविली आहे :

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Statement financial year by the taxpayer ssh
First published on: 30-08-2021 at 00:34 IST