आचार्य चाणक्य हे एक महान विद्वान होते. त्यांना अनेक विषयांचे ज्ञान होते. इतिहासातील एक महान तत्त्वज्ञानी म्हणून त्यांची ख्याती आहे. अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे. असं म्हणतात की आचार्य चाणक्य यांचे विचार जर आपण अंगीकारले तर आपल्याला आयुष्यात नेहमी यश मिळू शकते त्यामुळे अनेक जण त्यांच्या नीती फॉलो करतात.

माणसाने आयुष्य जगताना चाणक्य नीतींचा वापर केला तर माणूस कोणत्याही कठीण परिस्थितीतून मार्ग काढू शकतो. चाणक्य नीतीमध्ये अनेक गोष्टींविषयी सांगितले आहे.
चाणक्य नीतीनुसार चार चुकीच्या गोष्टींमुळे आपले वैवाहिक आयुष्य संकटात येते. त्या चार गोष्टी कोणत्या याविषयी आपण जाणून घेऊ या.

British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
lokmanas
लोकमानस: मौनामागचे रहस्य..
T M Krishna loksatta editorial Controversy over Karnataka singer t m krishnan awarded by Sangeet kalanidhi puraskar
अग्रलेख: अभिजाताची जात

हेही वाचा : Chanakya Niti : ‘या’ लोकांसोबत मैत्री करणे पडू शकते महागात, तुमच्या आयुष्यात आहेत का अशी माणसे? वाचा चाणक्य काय सांगतात…

अहंकार

चाणक्य नीतीनुसार पती-पत्नीच्या नात्यात अहंकार असेल तर नाते नकारात्मक मार्गावर वळते. चाणक्य मानतात की नात्यात पती-पत्नी समान असतात, त्यामुळे या नात्यात अहंकाराला कोणतीही जागा नाही. चाणक्य नीतीनुसार जर नात्यात अहंकार आला तर नाते संपुष्टात येऊ शकते.

पार्टनरवर शंका घेणे

चाणक्य नीतीनुसार पती-पत्नीच्या नात्यात शंकाला कोणतेही स्थान नाही. कारण अविश्वास नात्यात तेढ निर्माण करू शकतो. जर नात्यात गैरसमज आणि अविश्वास असेल तर नाते फार काळ टिकत नाही, असे मानले जाते.

हेही वाचा : Chanakya Niti: चाणक्य नीतीनुसार ‘या’ तीन चुकीच्या सवयींमुळे महिला येऊ शकतात अडचणीत, आजच सावध व्हा; नाही तर…

पार्टनरसोबत खोटे बोलू नका

कोणतेही नाते विश्वासावर अवलंबून असते, त्यामुळे नात्यात प्रामाणिकपणा असणे, खूप जास्त गरजेचे आहे. चाणक्य नीतीनुसार पार्टनरसोबत खोटे बोलू नका. असे म्हणतात की तुमचे एक खोटे तुम्हाला महागात पडू शकते. कदाचित तुमचे नाते संकटात येऊ शकते.

आदर सन्मान

चाणक्य नीतीनुसार पती-पत्नीच्या नात्यात एकमेकांचा आदर करणे, खूप जास्त गरजेचे आहे. चाणक्य सांगतात की जर नात्यात एकमेकांविषयी आदर भावना नसेल तर नाते तुटण्याची जास्त शक्यता असते.