आचार्य चाणक्य हे महान विद्वानांपैकी एक आहे. त्यांची चाणक्य नीती जगप्रसिद्ध आहे. वैवाहिक आयुष्य असो की समाज, राजकारण, व्यवसाय, पैसा किंवा आरोग्य यावर चाणक्य नीतीमध्ये त्यांनी आपले विचार मांडले आहे. त्यांची नीती आजही अनेक जण फॉलो करतात.
आज आपण चाणक्य नीतीनुसार महिलांच्या त्या तीन सवयींविषयी जाणून घेणार आहोत, ज्यामुळे महिला अडचणीत येतात, असे मानले जाते.

१. आजारपण लपवू नये…

अनेक महिलांना आजारपण लपवण्याची सवय असते. त्या कोणत्याही आजाराकडे गांभीर्याने पाहत नाहीत, मात्र त्यानंतर आजारपण वाढल्यास त्यांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागते. त्यामुळे चाणक्य नीती सांगते की महिलांनी आपला आजार कधीही लपवू नये.

Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
Numerology Girls born on this date are lucky for husband
Numerology: नवरा आणि सासरच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरतात या जन्मतारखेच्या मुली; जाणून घ्या त्या तारखा कोणत्या?
mercury retrograde in aries negative impact on these zodiac sing budh vakri
एप्रिलमध्ये बुध करणार वक्री चाल; ‘या’ राशींच्या लोकांच्या जीवनात येणार संकट? आर्थिक हानीची शक्यता

हेही वाचा: Horoscope : राशीभविष्य, शनिवार २७ मे २०२३

२. प्रत्येक गोष्टीचा स्वीकार करणे..

अनेकदा महिला नवऱ्याने किंवा कुटुंबाने घेतलेल्या निर्णयाचा स्वीकार करतात. अनेकदा इच्छा नसतानाही त्या अनेक गोष्टी स्वीकारतात; कारण त्यांना घरात क्लेष नको असतो. त्यानंतर त्यांना पश्चात्तापही होतो. चाणक्य नीतीमध्ये सांगितले आहे की महिलांनी आपापली मते मांडायला पाहिजेत. आपला आत्मसन्मान जपला पाहिजे.

३. खोटे बोलू नये…

असं म्हणतात वाद टाळण्यासाठी अनेकदा महिला खोटे बोलून वेळ मारून नेण्याचा विचार करतात. त्यांच्या या सवयीमुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. चाणक्य यांच्या मते महिलांचे खोटे बोलणे अनेकदा त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबीयांना अडचणीत आणू शकते. त्यामुळे महिलांनी चुकूनही खोटे बोलू नये आणि नेहमी सत्याचा सामना करावा.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)