आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक गोष्टींना घेऊन वेगवेगळ्या मान्यता आहेत. यामध्येच, ‘नजर लागणे’ ही गोष्ट आपल्याकडे खूप गांभीर्याने घेतली जाते. यापासून वाचण्यासाठी अनेक गोष्टी केल्या जातात. यातील एक गोष्ट म्हणजे पायामध्ये काळा धागा धारण करणे. काही लोक फक्त फॅशन म्हणून काळा धागा बांधतात. परंतु धर्म आणि ज्योतिष शास्त्रात या गोष्टीला खूप महत्त्व आहे. काळा धागा धारण केल्याने जीवन आनंदी आणि समृद्ध होते तसेच हे अनेक संकटांपासून आपला बचाव करते. जाणून घेऊया हातामध्ये किंवा पायामध्ये काळा धागा धारण का करावा.

नकारात्मक शक्ती राहते लांब :

  • ज्योतिषशास्त्रानुसार काळा धागा धारण केल्याने नकारात्मक शक्ती दूर राहते आणि व्यक्ती अनेक प्रकारच्या संकटांपासून वाचते. याशिवाय काळा धागा धारण करण्याचे अनेक फायदे आहेत.
  • काळा धागा नजरेच्या दोषांपासून संरक्षण करतो. ज्यांना वारंवार नजर लागते, त्यांनी काळा धागा जरूर घालावा.

हातावर ‘ही’ खूण असणाऱ्या व्यक्ती बनतात मोठे अधिकारी; मिळते नशिबाची साथ

Unnatural intercourse, husband,
पतीने अनैसर्गिक संभोग करणे गुन्हा नाही; कायद्याने अशी मोकळीक मिळणे धोकादायक
Stridhan belongs to the woman husband has no right over it
स्त्रीधन महिलेचेच, त्यावर पतीचा अधिकार नाही…
British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
Why is neem and jaggery consumed during Gudi Padwa 2024
गुढीपाडव्याला कडुलिंब आणि गुळाचे सेवन का करतात? काय आहे कारण, तज्ज्ञांकडून जाणून घ्या….
  • कुंडलीत शनि ग्रह अशुभ स्थितीत असेल तर पायात काळा धागा धारण केल्याने खूप फायदा होऊ शकतो. यामुळे आरोग्य आणि आर्थिक स्थितीवर शनीचा नकारात्मक प्रभाव टाळता येईल. अन्यथा शनीची वाईट नजर खूप नुकसान करते.
  • ज्या लोकांना आर्थिक नुकसान होत आहे किंवा व्यवसायात नुकसान होत आहे. अशा लोकांना पायात काळा धागा घातल्याने खूप फायदा होऊ शकतो.
  • जर कुंडलीत राहू-केतू कमजोर असतील तर पायात काळा धागा जरूर घालावा. हे तुम्हाला अनेक प्रकारच्या संकटांपासून वाचवते. राहू आणि केतू हे छाया ग्रह आहेत, त्यांचे अशुभ असणे जीवन उध्वस्त करू शकते.

असा धारण करावा काळा धागा :

  • शनिवारी काळा धागा धारण करा.
  • काळा धागा नेहमी भैरव मंदिरात नेल्यानंतरच धारण करावा. तसेच पायात काळा धागा धारण केल्यानंतर शनिदेवाच्या बीज मंत्राचा किमान २१ वेळा जप करावा.

‘या’ राशीचे लोक असतात आपल्या मर्जीचे मालक; ठरवलेली गोष्ट पूर्ण करूनच घेतात दम

  • काळ्या धाग्यासोबत कधीही लाल किंवा पिवळा धागा घालू नका.
  • काळा धागा धारण केल्यानंतर गायत्री मंत्राचा दररोज ११ वेळा जप करण्याचा प्रयत्न करा. यामुळे अधिक फायदा होईल.

(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)