Mahavir Jayanti 2022: महावीर जयंती हा जैन समाजाचा सर्वात मोठा सण आहे. जैन ग्रंथानुसार, जैन समाजातील शेवटचे तीर्थंकर भगवान महावीर यांचा जन्म चैत्र शुक्ल पक्षातील त्रयोदशीला झाला, त्यामुळे जैन धर्मीय लोक हा दिवस त्यांचा जन्मदिवस म्हणून मोठ्या थाटामाटात साजरा करतात. भगवान महावीरांच्या आईचे नाव त्रिशाला आणि वडिलांचे नाव सिद्धार्थ होते. भगवान महावीरांचे बालपणीचे नाव वर्धमान होते. वयाच्या ३० व्या वर्षापासून त्यांचा अध्यात्माकडे कल होता, त्यांनी राजवाडा सोडला आणि तपश्चर्या करण्यास सुरुवात केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भगवान महावीर कोण होते?
भगवान महावीरांनी अहिंसा परमो धर्माचा संदेश जगभर पसरवला. त्यांचे बालपणीचे नाव वर्धमान होते. त्यांचा जन्म बिहारमध्ये इ.स.पूर्व ५९९ मध्ये लिच्छवी घराण्याचे महाराज सिद्धार्थ आणि राणी त्रिशाला यांच्या पोटी झाला. महावीर यांनी वयाच्या तिसाव्या वर्षी ज्ञानप्राप्तीसाठी राजवाड्यातील सुखांचा त्याग केला होता, त्यानंतर त्यांनी तपश्चर्याचा मार्ग स्वीकारला होता. असे मानले जाते की १२ वर्षांच्या कठोर तपश्चर्येनंतर त्याने आपल्या इंद्रियांवर विजय मिळवला होता. त्यामुळे त्यांना महावीर या नावाने ओळख मिळाली.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahavir jayanti 2022 celebration muhurt rmt
First published on: 14-04-2022 at 10:45 IST