सरकारकडून कर्जमाफीचा दिलासा मिळत असतानाच अवकाळी पावसामुळे पुन्हा एकदा शेतकरी चिंतातूर झाला आहे. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्याला शनिवारी रात्री अवकाळी पावसाने तडाखा दिला.

औरंगाबादच्या वाळूंज, सिल्लोडसह आसपासच्या भागात पावासाच्या जोरदार सरी कोसळल्या तर, जालन्यामध्ये अंबडला अवकाळी पावसाचा तडाखा बसला.

जालन्यातील घनसावंगी, अंबड, भोकरदन या परिसरात शनिवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. औरंगाबाद शहरातही पावसाच्या सरी कोसळल्या. आंबा आणि द्राक्ष बागेतील मोहरावर या पावसाचा परिणाम होऊ शकतो.