औरंगाबादमध्ये शेख शकील ( वय २१), शेख शाहरुख (वय २०) आणि शोएब सलिम ( वय २०) या तीन किशोर वयीन तरुणांनी पैशासाठी दोघांवर चाकू हल्ला केला. दोन वेगवेगळ्या ठिकाणी या घटना घडल्या. हल्ल्यातील बालाजी वैध्य यांची प्रकृती स्थिर आहे. तर दिनेश लोढीया यांची मृत्यूशी झुंज सुरु आहे. तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तिघांनी रात्री कर्णपुरा येथे वैध यांना अडवलं आणि पैशांची मागणी केली. त्यांनी पैसे देण्यास नकार देत प्रतिकार केला असता त्यांच्या पायावर, पाठीवर चाकूने वार केले. रात्री दोनच्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर याच तिघांनी तिसगाव फाट्याजवळ दिनेश लोढीया यांच्यावर अशाच प्रकारचा हल्ला केला. त्यांच्या पोटाला गंभीर दुखापत झाली असून मृत्यूशी त्यांची झुंज सुरु आहे. पहिली घटना रात्री दोनच्या सुमारास घडली. तर दुसरी पहाटे चार वाजेच्या सुमारास. दोन्ही घटनेत आरोपींनी ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटलाय.
पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आरोपीना अटक केली. मात्र यावेळी पोलीस निरीक्षक सावंत यांच्या हाताला दुखापत झाली.

तिघांनी लुटलेला मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.या धाडसी कारवाई बाबत आज आयुक्त यशस्वी यादव यांनी 50 हजार रुपयांचं बक्षीस देऊन पोलीस अधिकाऱ्यांच कौतुक केलं.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aurangabad crime teenager attack on two for money
First published on: 27-05-2017 at 20:04 IST