आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांची आर्त हाक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वडिलांनी आत्महत्या केल्यामुळे आमच्या जीवनाची झालेली होरपळ तुमच्याही मुलांच्या वाटेला येऊ देऊ नका, आत्महत्या करण्यासारखी चूक तुम्ही करू नका, असा संदेश देत ३० मुला-मुलींची दिंडी शुक्रवारी येथे दाखल झाली. या दिंडीने औरंगाबादकरांचे लक्ष वेधले. दिंडीतील मुलांनी खुलताबाद व नजीकच्या गावात जाऊन आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वनही केले.

नाशिक जिल्हय़ातील त्र्यंबकेश्वरनजीकच्या आधारतीर्थ येथील आश्रमात आत्महत्याग्रस्त शेतककऱ्यांच्या मुले, विधवा पत्नींना आधार दिला जातो. या ठिकाणच्या ३० मुले व मुलींची शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी काढलेली दिंडी ७ जानेवारी रोजी जिजाऊ यांचे जन्मस्थान असलेले सिंदखेडराजा येथून निघाली आहे. शुक्रवारी औरंगाबादेत ही दिंडी दाखल झाली.

१५ जिल्हे व ६० तालुक्यांत जाऊन दिंडीतील मुले आत्महत्येचा विचार करणाऱ्यांना त्यापासून परावृत्त व्हावे, घरातील कर्त्यां पुरुषाने आत्महत्या केली तर मुला-मुलींची, पत्नी, आई-वडिलांची मानसिक अवस्था काय होते, याकडे लक्ष वेधत आहेत. दिंडीचा समारोप मुंबईत होणार आहे. दिंडीच्या माध्यमातून सहभागी झालेली मुले आमच्या जीवनाची होत असलेली होरपळ तुमच्या मुला-मुलींच्या वाटेला येऊ नये, यासाठी आत्महत्येसारखी चूक करू नका, असे आवाहन करीत आहेत. या संदर्भात मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आदींना निवेदन देण्यात येणार आहे.

 

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmer suicides in maharashtra
First published on: 14-01-2017 at 02:07 IST