लातूर शहर, अंबाजोगाई, धारूर, केजसह, ७२ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या धनेगाव धरणात रविवारी सायंकाळी ७ वाजता ७७ टक्के जलसाठा झाला असल्याची माहिती शाखा अभियंता अनिल मुळे यांनी दिली. १४ सप्टेंबर रोजी धनेगाव धरणात थेंबरही पाणी नव्हते. केवळ १० दिवसांत हे धरण ७७ टक्के भरले आहे. २००७ सालानंतर पहिल्यांच या धरणात एवढा मोठा पाणीसाठा झाला आहे. रविवारी सायंकाळी ७ वाजता धरणात १८३ दलघमी पाणीसाठा झाला होता. धनेगाव धरणात पाणी साठत असल्याचे वृत्त आजूबाजूच्या गावात पसरल्यामुळे शनिवारी व रविवारी, असे दोन दिवस धरणावर पाणी पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी झाली होती. सकाळपासूनच सहकुटुंब लोक धरणावर येत होते. डॉक्टर, इंजिनिअर अशा उच्चभ्रूंसह अगदी गरीब घरातील लोकही पाणी पाहण्यास येत होते. तब्बल ९ वर्षांनंतर धरणात पाणीसाठा साचल्यामुळे पाणी पाहायला मिळत असल्याचा लोकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लातूर जिल्ह्य़ात ११५ टक्के पाऊस

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manjara dam 77 percent full by water
First published on: 26-09-2016 at 01:27 IST