scorecardresearch

Premium

शिवसेनेच्या भूमिकेने राज्यात मध्यावधीची शक्यता- सातव

बिहारमधील निवडणूक निकालाच्या पाश्र्वभूमीवर शिवसेनेची भूमिका पाहता राज्यात मध्यावधी निवडणुकीची शक्यता आहे.

बिहारमधील निवडणूक निकालाच्या पाश्र्वभूमीवर शिवसेनेची भूमिका पाहता राज्यात मध्यावधी निवडणुकीची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छाती किती इंची आहे हेच बिहारच्या जनतेने दाखवून दिल्याचे मत खासदार राजीव सातव यांनी व्यक्त केले.
सातव यांच्या येथील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन बुधवारी त्यांच्या हस्ते झाले. यानंतर पत्रकारांशी बोलताना बिहार निवडणुकीच्या निकालाबाबत त्यांनी संवाद साधला. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश थोरात, शहराध्यक्ष बापूराव बांगर, विलास गोरे, मुजीब पठाण आदींची उपस्थिती होती. सातव म्हणाले, की बिहारच्या निवडणुकीत भाजपचे पानिपत झाले. यापुढे मोदी सरकार व भाजपचा पराभव हा काँग्रेस पक्षाचा एकमेव अजेंडा असेल. समविचारी पक्षांना सोबत घेऊन निवडणुका लढविल्या जातील. बिहारच्या निवडणुकीत राहुल गांधी यांची भूमिका निर्णायक ठरली. लालूप्रसाद यादव व नीतिशकुमार एकमेकांचे कट्टर विरोधक होते. त्यांना एकत्र आणण्याचे काम राहुल गांधी यांनी केल्याचा दावा त्यांनी केला.
बिहारच्या निवडणुकीत मोदी यांनी ज्या ३५ विधानसभा मतदारसंघांत सभा घेतल्या. त्या ठिकाणी भाजपचे ८-९ उमेदवार विजयी झाले. मात्र, ज्या २५ ठिकाणी त्यांनी सभा घेतल्या त्या मतदारसंघांत त्यांना भोपळाही फोडता आला नाही. मोदींची लाट व जादू जनतेने नाकारली. हा देश सर्व जातिधर्माचा आहे, हेच या निकालाने दाखवून दिल्याचे त्यांनी सांगितले. बिहारमधील निवडणूक निकालाच्या पाश्र्वभूमीवर शिवसेनेची भूमिका लक्षात घेता फडणवीस सरकार फार काळ टिकणार नाही. ही निकालाची नांदी असून, राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता निर्माण झाल्याचा दावा त्यांनी केला.

chandrashekhar bawankule
सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर राजकीय हालचालींना वेग, भाजपाकडून ‘प्लॅन बी’ तयार? बावनकुळे म्हणाले…
canada allegations on india
India-Canada Conflict: कॅनडाचे भारतावर आरोप, अमेरिका व ऑस्ट्रेलियाचा कॅनडाला पाठिंबा; जागतिक स्तरावर भारतविरोधी भूमिका!
abhidnya bhave shared swami samarth experience
नवऱ्याच्या आजारपणात अभिज्ञा भावेला ‘अशी’ आली स्वामींची प्रचिती; अनुभव सांगत म्हणाली, “तेव्हा माझ्या डोळ्यात…”
canada prime minister justin trudeau (1)
कॅनडाच्या पंतप्रधानांचं जी २० परिषदेवेळीच बिनसलं होतं? ‘या’ कृतीमुळे झाली होती भारतीय सुरक्षा यंत्रणेची अडचण!

Latest Comment
View All Comments
Post Comment

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-11-2015 at 01:40 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×