जालना-मुंबई हाय स्पीड ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ उद्घाटन सोहळा वादाचा ठरला आहे. छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन येथे एमआयएम आणि भाजपाचे कार्यकर्ते समोरा-समोर आलेले पाहायला मिळाले. खासदार इम्तियाज जलील यांचं संभाजीनगर स्टेशनमध्ये आगमन झाल्यानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी ‘मोदी-मोदी’ अशी घोषणाबाजी केली. तर, पोलिसांनी एमआयएमच्या कार्यकर्त्यांना रेल्वे स्टेशन बाहेर काढलं.

जालना-मुंबई ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ रेल्वे प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून तिचं उद्घाटन पार पडेल. पण, उद्घाटन पत्रिकेत नाव नसल्याचं नाराजी नाट्य समोर आलं आहे. इम्तियाज जलील यांनी नाव आमंत्रण न मिळाल्यानं आणि पत्रिकेत नाव नसल्यानं भाजपावर टीका केली.

Jasprit Bumrah Statement on Hardik Pandya Booed in IPL
Jasprit Bumrah: “सर्वजण एकत्र होतो अन् त्याला…” हार्दिकची हुर्याे उडवली जात असताना MI संघात कसं वातावरण होतं? बुमराहचं मोठं वक्तव्य
Nagpur, smart prepaid meters, Devendra Fadnavis, Anti Smart Electric Meter Citizen Struggle Committee, Mahavitaran, protest, electricity sector
सरकारवर लोकांचा विश्वास नाही? स्मार्ट प्रीपेड मीटरविरोधात पुन्हा आंदोलन…
Fire on Gorakhpur Express Disrupting Central Railway Services
मध्य रेल्वे आज का विस्कळीत ? गोरखपूर एक्स्प्रेसमधून धुराचे लोट
Girder launched by Railway and Local Works Department and MP Amar Kale Nagpur
वर्धा: श्रेयवादात खासदार एक पाऊल पुढेच! मध्यरात्रीच मेगाब्लॉक व गर्डर लॉंचिंग..
Prime Minister Narendra Modi in Mumbai on July 13 mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी १३ जुलै रोजी मुंबईत; गोरेगाव – मुलुंड बोगद्याच्या कामाचे भूमिपूजन
Four and a half hours delay to Vande Bharat in Konkan mumbai
कोकणातील वंदे भारतला साडेचार तासांचा विलंब
Nana Patole Criticizes mahayuti Government over Ladki Bahin Yojana, Congress, Nana Patole, Congress State President Nana Patole, Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024, Election Gimmick, marathi news,
“नक्कल करायलाही अक्कल पाहिजे, ती अक्कल महायुती सरकारमध्ये…,” नाना पटोलेंची टीका
Mumbai vande bharat express marathi news
मुंबई: जोरदार पावसाने वंदे भारत एक्स्प्रेस रद्द, रेल्वेगाड्यांचे मार्ग बदलले

त्यातच छत्रपती संभाजीनगर येथे ‘वंदे भारत एक्स्प्रेस’चं आगमन होणार होतं. त्यापूर्वी इम्तियाज जलील हे रेल्वे स्थानकावर पोहोचले. तेव्हा भाजपाच्या कार्यकर्त्यांनी ‘मोदी-मोदी’ अशी घोषणाबाजी केली. तर, एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी जलील यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.

“सगळ्यांची नावं वगळण्यात आली आहे”

जलील प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, “लोकशाही मार्गानं माझा निषेध दर्शवण्याचा पूर्ण अधिकार आहे. कोणत्याही प्रकारचा कायदा आम्ही हातात घेतला नाही. भाजपानं हा रेल्वेचा कार्यक्रम न ठेवता पक्षाचा कार्यक्रम केला आहे. सगळ्यांची नावं वगळण्यात आली आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत फक्त ‘मोदी-मोदी’ हेच काम यांना राहिलं आहे. पोलिसांनी बळजबरीनं माझ्या कार्यकर्त्यांना बाहेर काढलं.”

“रेल्वे स्टेशन भाजपाची मालमत्ता नाही’

“माझ्या कार्यकर्त्यांनी मुंबईला जाताना रेल्वे थांबवली, तर याची जबाबदारी पोलिसांची असेल. आमच्या लोकांना बाहेर काढण्यात येत असेल, तर भाजपाच्या लोकांनाही बाहेर काढा. रेल्वे स्टेशन भाजपाची मालमत्ता नाही,” अशी टीका जलील यांनी केली आहे.

“ज्यांचं सरकार असतं ते श्रेय घेण्याचं काम करतं”

पालकमंत्री संदीपान भुमरेांनी म्हटलं, “संभाजीनगरला सुसज्ज अशी ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ मिळाली आहे. यामुळे नागरिकांचा वेळ वाचणार आहे. प्रोटोकॉलनुसार रेल्वे विभागानं पत्रिकेत नावे टाकली असतील. पत्रिकेत कुणाचं नाव आहे नाही, हे मी पाहिलं नाही. ज्यांचं सरकार असतं ते श्रेय घेण्याचं काम करतं. जलील विरोधी पक्षाचं काम करतात.”