देवेंद्र फडणवीस यांची टीका

औरंगाबाद : राज्यातील रेल्वे प्रकल्पांसाठी ५० टक्के स्वहिस्सा देण्याचा निर्णय राज्य सरकारने रद्द केला आहे. परिणामी, सर्व प्रकल्प बंद झाले आहेत. ते सुरू करायचे असतील तर राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी सूचना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केली. राष्ट्रीय बँक परिषदेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. या वेळी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची उपस्थिती होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२८ हजार कोटी रुपयांचे रेल्वे प्रकल्प राज्यात घेतले जाणार होते. परंतु राज्य सरकारने ५० टक्के हिस्सा देण्यास नकार दिल्याने हे प्रकल्प आता पुढे जाऊ शकणार नाहीत. मुख्यमंत्री असताना महारेल कॉर्पोरेशन गठीत करून १००हून अधिक रेल्वे पुलांचे बांधकाम पूर्ण केले होते. तसेच रेल्वेचे विविध प्रकल्प आता बंद झाले आहेत. सुरेश प्रभू आणि पीयूष गोयल रेल्वेमंत्री असताना मंजूर केलेले प्रकल्प राज्य सरकारच्या आडमुठे धोरणाने बंद पडल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: State government policy funding railway projects stubborn devendra fadnavis ssh
First published on: 17-09-2021 at 02:16 IST