– शेखर जोशी

‘विजयी भव डोंबिवलीकर’ अशी मोठी होर्डिंग डोंबिवलीत लागली आहेत. डोंबिवलीकरांनी ‘कोथरुडकरां’चा राग आळवला तर? अर्थात कोथरुडमध्येही काही वेगळे घडणार नाही.

Cm Devendra Fadnavis Statement About Suresh Dhas
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सुरेश धस आधुनिक भगीरथ एकदा मागे लागले की डोकं खाऊन….”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Will return both maces Chandrahar Patils stance in protest against umpire
दोन्ही गदा परत करणार! पंचाच्या निषेधार्थ चंद्रहार पाटलांची भूमिका
loksatta editorial on Stampede at Mahakumbh in Prayagraj
अग्रलेख: मेजॉरिटीची मौनी ममता!
kshitee jog
“एक झिम्मा चालला म्हणजे…”, क्षिती जोग ‘त्या’ चित्रपटाच्या अपयशावर काय म्हणाली?
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
Sturggle Story
“शर्यत धावण्याची असो किंवा आयुष्याची…संघर्ष रडवतो पण इतिहास घडवतो!” चिमुकलीने केलं सिद्ध, Viral Video देतोय जगण्याची प्रेरणा

अर्थात इथे राग आळवायचे कारण वेगळे आहे. तसे झाले तर न भूतो…असे घडेल. पण शक्यता कमीच आहे. दगडाला शेंदूर फासून उभा केला तरी तो डोंबिवलीतून निवडून येईल, इतके ‘डोंबिवलीकरां’ना ‘डोंबिवलीकरा’ने गृहीत धरलेले आहे. पण यावेळी कदाचित मताधिक्य घटेल असे वाटते.
लोकसभेच्यावेळी राष्ट्रघातक्यांशी हातमिळवणी केल्यामुळे आणि ‘लाव रे तो व्हिडिओ’ च्या प्रयोगामुळे एक वर्ग ‘मनसे’नाराज आहे. खरे तर याच वर्गाने कडोंमपाच्या निवडणुकीत ‘मनसे’ मतदान केल्यामुळे संघ, भाजपाच्या बालेकिल्ल्यातही भाजप उमेदवारांना धूळ चारुन ‘मनसे’ उमेदवार निवडून आले होते. पण आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे.

जनमानसातील विश्वासार्हता गमावलेल्या राष्ट्रघातक्यांशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हातमिळवणी केली नसती तर त्याचा फायदा नक्कीच विजयी भव डोंबिवलीकरला अविजयी करण्यात झाला असता. केवळ ‘ आडनाव’ हा मुद्दा फार प्रभावी ठरेल अशी शक्यता नाही. तसे झाले तर तो मोठा चमत्कार म्हणावा लागेल. त्यामुळे फार काही धक्कादायक घडेल असे वाटत नाही.

कोथरुडप्रमाणेच डोंबिवलीही सुरक्षित मतदार संघ होता. पण…इकडे कोथरुड सारखे ‘सॉफ्ट’ टार्गेट नाही. असे झाले असते तर…

– इथल्या दादांनी त्या दादांनाही पाडले असते.
– बंडखोरी करून अपक्षही निवडणूक लढवली असती.
– किंवा पक्षांतरही केले असते.

आणि म्हणून तो धोका ‘मा.मुं.’ नी पत्करला नाही. शिवाय या दादांवर ‘मा.मुं’चाही खास वरदहस्त असल्याने पत्ता कापणे शक्यच नव्हते.

त्यामुळे…

मागील पानावरून पुढील पानावर…

पण तरीही प्रतिस्पर्ध्यालाही शुभेच्छा…

Story img Loader