मागील लेखातून आपण गदर चळवळ नेमकी काय होती? ती कुठे सुरू झाली आणि त्यामागचा उद्देश नेमका काय होता? याबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण होमरूल लीगविषयी जाणून घेऊ. पण त्यापूर्वी होमरूल हा शब्द नेमका कुठून आला? एकंदरीतच याची पार्श्वभूमी काय होती? हे समजून घेणे गरजेचे आहे.

हेही वाचा – UPSC-MPSC : ‘गदर चळवळ’ काय होती? ती कधी सुरू झाली?

Badlapur sexual assault case,
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण: आरोपीच्या चारित्र्याविषयी माहिती गोळा करण्याचे काम सुरू
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Rape on Minor Girl
Crime News : “मावशी, बलात्कार म्हणजे काय?”, अल्पवयीन पीडितेने सामूहिक बलात्काराच्या दोन दिवस आधी विचारला होता प्रश्न
Badlapur Case what is Shakti Criminal Laws
Badlapur Case : बदलापूर प्रकरणानंतर ‘शक्ती कायद्या’च्या मागणीला जोर, काय आहे मविआ सरकारने मांडलेलं विधेयक?
Loksatta vyaktivedh Army Chief General Sundararajan Padmanabhan Terrorist attack army
व्यक्तिवेध: जनरल (नि.) एस. पद्मानाभन
reservation, poverty, social disparities,
सामाजिक भेद मिटवणे हे मूळ उद्दिष्ट, मग आरक्षण ही ‘गरिबी हटाव’ योजना कशी असू शकते?
loksatta analysis wayanad disaster in light of gadgill commission report
पश्चिम घाट पर्यावरण संवर्धनासंदर्भात माधव गाडगीळ समिती अहवाल काय आहे? अहवालाकडे दुर्लक्षामुळेच वायनाडमध्ये प्रलय? 
bombay hc waives 6 months cooling period granted divorce to couple by mutual consent
सामाजिक बदलांच्या पार्श्वभूमीवर वास्तववादी दृष्टिकोन स्वीकारा; समुपदेशन कालावधी माफ करून घटस्फोट मंजूर करताना न्यायालयाचे निरीक्षण

होमरूल ही संकल्पना पहिल्यांदा १८६० च्या दशकात आयर्लंडमध्ये मांडण्यात आली. त्यावेळी आयर्लंडमध्ये ब्रिटिशांची सत्ता होती. तेथील लोकांनी स्वयंशासनाची मागणी ब्रिटिशांकडे केली. त्यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलनेही करण्यात आली. परिणामत: ब्रिटिशांनी १८८६ मध्ये आयरिश होमरूल बिल ब्रिटिश संसदेत मांडले. मात्र, हे बिल १९२० मध्ये पारित झाले.

भारतातील होमरूल चळवळही आयर्लंडमधील होमरूल चळवळीपासून प्रेरित होती. ॲनी बेझंट यांनी होमरूल चळवळीची संकल्पना भारतात आणली. पण, ज्या वेळी ॲनी बेझंट या भारतात आल्या, त्या होमरूल चळवळीसाठी नाही, तर थिओसॉफिकल सोसायटी ऑफ इंडियामध्ये सहभागी होण्यासाठी. काही दिवसांत भारतात ॲनी बेझंट यांची लोकप्रियता वाढू लागली. बेझंट या थिओसॉफिकल सोसायटीमध्ये सहभागी होण्यासाठी भारतात आल्या असल्या तरी त्यांची रुची ही भारतीय राजकारणात होती. त्यातून त्यांनी १९१४ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तसेच त्यांनी १९१५ च्या काँग्रेस अधिवेशनात होमरूल लीगची संकल्पना मांडली. मात्र, काँग्रेसमधील मवाळ नेत्यांनी याबाबत कोणताही प्रतिसाद दिला नाही.

हेही वाचा – UPSC-MPSC : पंजाबमधील क्रांतिकारी चळवळ आणि दिल्ली-लाहोर कट खटला

दरम्यान, १९१४ मध्ये बाळ गंगाधर टिळक यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली होती. १९१५ च्या काँग्रेस अधिवेशनात टिळकही सहभागी झाले होते. त्यांनी ॲनी बेझंट यांच्या होमरूल लीगच्या संकल्पनेला पाठिंबा दिला आणि १९१६ मध्ये दोन होमरूल लीगची स्थापना झाली. त्यापैकी एका लीगचे नेतृत्व हे टिळकांकडे; तर दुसऱ्या लीगचे नेतृत्व हे ॲनी बेझंट यांच्याकडे होते. दोन्ही होमरूल लीगने एकमेकांना सहकार्य केले. त्यांनी सर्वत्र होमरूल म्हणजेच स्वयंशासनाच्या समर्थनार्थ प्रचार सुरू केला. दोन्ही लीगच्या चळवळी झपाट्याने देशभरात पसरल्या. काँग्रेसच्या मवाळ नेतृत्वामुळे असमाधानी असलेले लोक होमरूल चळवळीशी जोडले जाऊ लागले. होमरूल लीगची वाढती लोकप्रियता बघता, होमरूल लीगवर ब्रिटिश सरकारचा रोष ओढवला. अखेर जून १९१७ मध्ये ॲनी बेझंट यांना अटक करण्यात आली. मात्र, त्यानंतर जनसामान्यांनी केलेली आंदोलने आणि कॉंग्रेस नेत्यांचा दबाव बघता, १९१७ मध्ये सरकारला त्यांची सुटका करावी लागली. पुढे दोन्ही होमरूल लीग काँग्रेसमध्ये विलीन झाल्या.