गुढीपाडव्याला श्रीरामांची आठवण येते. ‘श्रीराम’ या नावाबरोबरच त्यांचे गुण, त्यांचा पराक्रम, त्यांची कर्तव्यनिष्ठा, त्यांच्या मनाचा समतोलपणा आठवतो. गुढीपाडव्याच्या निमित्ताने त्यांचा कोणताही एक गुण आपण अंगी बाणविण्याचा निश्चय आणि त्यानुसार प्रयत्न केला तर आपल्या आतच अ-युध्या (शांतता) का होणार नाही?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कालच गुढीपाडवा झाला. नवं शालिवाहन शक सुरू झालं. हा वर्षांरंभाचा सण महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि इतर किती तरी ठिकाणी उत्साहानं साजरा केला जातो. वसंत ऋतूचं आगमन झालेलं असल्याने झाडांनी, वाऱ्याच्या साहाय्याने स्वत:ला हलवून, अंगावरची जुनी, मलीन वस्त्रे पानगळतीच्या रूपात टाकलेली असतात आणि नवीन पालवीची मोहक वस्त्रे अंगाखांद्यावर धारण केलेली असतात. आसमंत आंब्याच्या मोहोराने आणि मोगऱ्याच्या सुगंधाने भरून आणि भारून गेलेला असतो. कोकिळेचे मधुर पाश्र्वगायन वातावरण अधिकच प्रसन्न करतं. अशा निसर्गनिर्मित सुंदर वातावरणात गुढी उभारून प्रभू रामचंद्रांच्या अयोध्येतील पुनरागमनाचं स्वागत होणारच. श्रीराम जरी अयोध्येत परतले तरी रामराज्य हे सर्वानाच हवंहवंसं असल्याने गुढीपाडवा सर्वत्र आनंदात साजरा केला जातो.

मराठीतील सर्व जगू आनंदे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gudi padwa brings happiness
First published on: 09-04-2016 at 01:14 IST