वनस्पतीची अन्नाची गरज भागली की त्या आणखी काही मागत नाहीत. प्राण्यांचीही तीच रीत. जेवण झाले की ते तृप्त होतात. शांत होतात. परंतु आपण गरजेपुरतं अन्न, वस्त्र मिळालं की तृप्त होतो का? शांत होतो का? समाधानी असतो का? कधी याचं कारण शोधायचा प्रयत्न केलाय का?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या प्राथमिक गरजा आहेत, हे वाक्य आपण सर्वजण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. माणसाचंच कशाला, आजूबाजूच्या निसर्गातही पाहा. या जगात सजीव व निर्जीव सृष्टी असा पहिला भेद आपल्याला दिसतो. निर्जीव सृष्टीला; म्हणजे दगड, डोंगर वगैरेंना त्यांच्या अस्तित्वासाठी केवळ जागेची गरज असते. त्यापलीकडे कोणतीही गरज त्यांच्या ‘जगण्याला’ लागत नाही. सजीव सृष्टीला मात्र त्याहून जास्त काही तरी लागतं. सर्वात खालच्या स्तरावरची सजीव सृष्टी म्हणून वनस्पतींकडे पाहिलं तर त्यांची अन्न हीच एकमेव गरज असते व ही गरज मातीतल्या खनिजद्रव्यांमधून आणि पाण्यामधून भागवली जाते. त्यावरच्या स्तरावर असते प्राणिसृष्टी. त्यांना अन्न तर लागतंच पण बहुतेकांना निवाराही लागतो व तो निवारा घरटी, बिळं, गुहा वगैरेंमधून मिळतो. परंतु वस्त्राची गरज कोणत्याही प्राण्याला नसते (पाळलेले प्राणी अपवादात्मक). सर्वात वरच्या स्तरावर आपण- मानवप्राणी. त्याला अन्न आणि निवाऱ्याबरोबरच वस्त्राचीही गरज भासू लागली. पण माणसाचं रूपांतर जेव्हा ‘मॉडर्न मॅन’मध्ये झालं, तशी ‘गरज’ या शब्दाची व्याख्याही मॉडर्न झाली.
सध्या मोबाइल फोन आणि इंटरनेट या गोष्टी अन्न आणि पाणीइतक्याच महत्त्वाच्या (गरजा) झाल्या आहेत. नवीन नवीन गरजांचे ‘शोध’ लागत आहेत आणि त्या गरजा पुरविणाऱ्यांचे ओघ लागलेले आहेत. आपण घरात असलो काय किंवा बाहेर असलो काय, जाहिराती हा पर्यावरणाचा एक भागच झालाय. ‘विकत घ्या आणि विकून टाका’ हे जगण्याचे श्वास आणि उच्छ्श्वास झाले आहेत. पण खरी गंमत तर पुढेच आहे. वनस्पतीची अन्नाची गरज भागली की त्या आणखी काही मागत नाहीत. प्राण्यांचीही तीच रीत. जेवण झाले की ते तृप्त होतात. शांत होतात. परंतु आपण गरजेपुरतं अन्न, वस्त्र मिळालं की तृप्त होतो का? शांत होतो का? समाधानी असतो का? कधी याचं कारण शोधायचा प्रयत्न केलाय का? कोणत्याही थोर माणसाच्या चरित्रात आपल्याला आढळतं की, अन्न-वस्त्र-निवारा या प्राथमिक गरजा भागल्यानंतर ते त्यांच्या कार्याला लागले. कारण शरीराच्या गरजा भागविणं हे त्यांच्या दृष्टीनं मानवी जीवनाचं तरी उद्दिष्ट नव्हतं. पायात घालायला एक चप्पलचा जोड असला की पादत्राणाची गरज भागत होती. आता पादत्राणांची जागा फुटवेअरने घेतली आहे आणि शू-रॅक हे वेगवेगळ्या फुटवेअरचे भांडार झाले आहे.

मराठीतील सर्व जगू आनंदे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Roti kapda makaan and much more
First published on: 30-01-2016 at 01:14 IST