काळजीनं मनाच्या शक्तीचा ऱ्हास होतो. काळजी करता करता तिची सवय लागून ती करणं बरोबर आहे, असा भ्रमही ती निर्माण करते. आपल्याला अपयश येण्याच्या भीतीपोटी काळजी निर्माण होते. वास्तविक आपण केलेलं काम आणि त्याला मिळणारं यश-परिणाम हे नेहमी प्रमाणात असतात. त्यात भीतीला वाव नाही. स्वत:बद्दल बाळगलेल्या अवास्तव अपेक्षा, इतरांच्यात स्वत:बद्दल निर्माण केलेल्या अवाजवी चांगल्या प्रतिमा जपण्याचे प्रयत्न – माणसाच्या मनात काळजी निर्माण करतात. ते दूर करण्यासाठी काय कराल..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आठवडय़ातून एखादा दिवस मिळालेली मोकळी संध्याकाळ. चार वाजता उन्हं उतरल्यावर यायचं आणि सात-आठ वाजेपर्यंत परत निघायचं. यासाठी घरी आलेले जुने स्नेही अर्थात आजी-आजोबा. चार ते पाच साडेपाचपर्यंतचा वेळ बरेच दिवसांनी भेटल्यामुळं नवनव्या विषयांत, गप्पांत गेला. साडेपाच होत आले, त्याबरोबर त्यातल्या आजींची चुळबुळ सुरू झाली. थोडं गप्पांत, थोडं घडय़ाळाकडं लक्ष. त्या आजींना मी लग्नाची मुलगी असल्यापासून ओळखतो. वहिनी, काकू, आजी असा त्यांचा सगळा प्रवास मी डोळ्यांसमोर पाहिलेला आहे. त्यामुळं आत्ताची चुळबुळ कशानं सुरू झाली आहे, हे लक्षात यायला वेळ लागला नाही. म्हणून विचारलं, ‘‘आज आहे ना अजून वेळ? अजून गप्पा, चहापाणी व्हायचं आहे!’’

मराठीतील सर्व मन तरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suhas pethe marathi articles on dealing with worry and anxiety
First published on: 25-03-2017 at 02:40 IST