भारतात साखरेची प्रतवारी ठरवण्याची रासायनिक पद्धत उपलब्धच नव्हती. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय साखरेला खूप कमी दर मिळे. आपण या क्षेत्रात काही तरी करावं, आपल्या मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग करावा, असं डॉ. वसुधा केसकर यांना वाटायला लागलं आणि त्यांनी ‘मार्क लॅब’ची स्थापना केली. आज खाद्यउद्योगाच्या जागतिक नकाशावर ‘मार्क लॅब’ आणि त्याचबरोबर डॉ. वसुधा केसकर हे एक अतिशय महत्त्वाचं नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुमारे वीसएक वर्षांपूर्वीपर्यंत भारतात अनेक ठिकाणी साखर बनत असे आणि तिची प्रतवारी चक्क डोळ्यांनी बघून ठरवली जात असे. म्हणजे पांढरीशुभ्र असेल तर शुद्ध आणि मग तिला जास्त भाव. पिवळसर असेल तर जरा अशुद्ध आणि तिला कमी भाव असा प्रकार असायचा. देशातल्या देशात हे चालून जायचे आणि यात बदल करायची कोणालाच गरज भासत नव्हती. साधारणपणे दर तीनएक वर्षांनी साखरेचे प्रचंड उत्पादन झाले की साखर निर्यात करायची वेळ यायची आणि मग परदेशातलेच रिफाइंड म्हणजे शुद्ध साखरेचे नियम लावून आपली साखर प्रमाणित करण्याचा प्रयत्न केला जायचा. त्या वेळी मात्र साखरेची प्रत अगदी कमी दिसायची आणि दरही अगदीच कमी मिळायचा.

मराठीतील सर्व उद्योगभरारी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Story of sugar
First published on: 24-09-2016 at 01:07 IST