दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढविल्याने केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी त्यांच्याविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे. केजरीवाल यांना केवळ ‘नाटक’ करण्यातच स्वारस्य आहे, तर एनडीएचा उत्तम कारभारावर विश्वास आहे, असे रिजिजू यांनी म्हटले आहे.
केंद्र सरकार मागील दरवाजाने दिल्लीचे प्रशासन चालविण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीका केजरीवाल यांनी शुक्रवारी केली होती. त्याबाबत रिजिजू म्हणाले की, केजरीवाल यांना उत्तर देण्याची गरज नाही, ते नाटकच करीत असतात, आमचा उत्तम कारभारावर विश्वास आहे. यामुळे केजरीवाल यांच्या नाटकाला कोणीही भुलणार नाही, असे त्यांनी सांगितले.