मणिपूरमधील हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्षांनी संसदेत नरेंद्र मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडला आहे. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (एआयएमआयएम) पक्षाचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी या अविश्वास ठरावावर बोलताना मोदी सरकारवर हल्लाबोल केला. तसेच मणिपूरमधील परिस्थिती इतकी गंभीर असताना तिथल्या मुख्यमंत्र्यांची पदावरून हकालपट्टी का केली नाही? असा प्रश्नही उपस्थित केला.

खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मणिपूर आणि हरियाणातील हिंसाचारावरून सरकारला धारेवर धरलं. तसेच या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा का मागितला नाही? असा प्रश्नही उपस्थित केला. दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री तिथल्या हिंसाचाराला जबाबदार असून त्यांना आजपर्यंत त्या पदावरून हटवलं का नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीसांची विरोधकांवर टीका; म्हणाले, “काँग्रेसने अनेक वर्ष राज्य केलं, पण जनतेला फक्त चॉकलेट…”
ajit pawar sharad pawar (3)
“…तेव्हा शरद पवार म्हणालेले अजितला राजकारण करू द्या, मी शेती करतो”, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितला १९८९ मधला प्रसंग
bjp rajput voters in up
उत्तर प्रदेशमध्ये भाजपा अडचणीत! तिकीट वाटपावरून राजपूत समुदाय पक्षावर नाराज
Vijay Vadettiwars challenge to Dharmaraobaba Atram
“भाजपसोबतच्या बैठकीचे पुरावे दिल्यास राजकारण सोडणार, अन्यथा तुम्ही सोडा,” विजय वडेट्टीवार यांचे धर्मरावबाबा आत्राम यांना आव्हान

औवेसी म्हणाले, मणिपूर आणि हरियाणाचे मुख्यमंत्री काय करतायत? एकीकडे ५० हजार लोक बेघर झाले आहेत, तर दुसऱ्या राज्यात तीन महिन्यांपासून हिंसाचार सुरू आहे. महिलांची विवस्त्र धिंड काढली गेली. पोलीस ठाण्यांसह सरकारी शस्त्रास्त्र लुटली जात आहेत. यावेळी ओवैसी यांनी एक शायरी म्हणत सरकारवर टीका केली. ओवैसी म्हणाले, ‘कुर्सी है तुम्हारा ये जनाज़ा तो नहीं है, कुछ कर नहीं सकते तो उतर क्यों नहीं जाते?

हे ही वाचा >> “दाढी आणि कपडे पाहून त्याने…”, असदुद्दीन ओवैसींनी लोकसभेत मांडला जयपूर-मुंबई ट्रेनमधील हत्याकांडाचा मुद्दा

मणिपूरचे मुख्यमंत्री का बदलले नाहीत?

दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री बदलण्याच्या मागणीवर काल (९ ऑगस्ट) लोकसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर दिलं होतं. ते म्हणाले होते की मणिपूरचे मुख्यमंत्री केंद्राला सहकार्य करत आहेत आणि सध्या अशा बदलाची गरज नाही. जर एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री केंद्राला सहकार्य करत नसतील तर तशा पद्धतीच्या हालचाली (मुख्यमंत्री बदलाच्या) करता येतात. परंतु, हे मुख्यमंत्री केंद्राला सहकार्य करत आहेत. जेव्हा एखादं राज्य सरकार सहकार्य करत नसतं, तेव्हा तिथे कलम ३५६ लागू करता येतं. आम्ही मणिपूरच्या पोलीस महासंचालकांची उचलबांगडी केली आहे.