Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

मणिपूर

मणिपूर (Manipur) हे भारताच्या ईशान्य भागातील एक राज्य आहे. ईशान्येकडच्या सात राज्यांपैकी मणिपूर हे महत्त्वपूर्ण राज्य आहे. या राज्याच्या उत्तरेस नागालॅंड, दक्षिण भागाला मिझोराम, पश्चिमेस आसाम ही राज्ये आहेत. मणिपूरची पूर्वेची सीमा ही म्यानमार देशाला संलग्न आहे. इंफाळ हे मणिपूरमधील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर मणिपूरची राजधानीदेखील आहे. या राज्याचे क्षेत्रफण २२.३२७ चौ.किमी इतके आहे. तेथे मणिपुरी ही प्रमुख भाषा असली तरी तेथे अन्य भाषाही बोलल्या जातात. त्यामध्ये काही आदिवासी भाषांचा सुद्धा समावेश आहे. ब्रिटीश काळात मणिपूर हे एक संस्थान होते. संपूर्ण देशामध्ये स्वातंत्र्यलढा सुरु असताना या भागात देखील स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले होते.


१९३० च्या उत्तरार्धामध्ये राज्यातील नागरिकांनी भारतीय संघराज्यामध्ये सहभागी होण्याची इच्छा प्रकट केली. पुढे १९३९ मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी विलीनीकरणावर वाटाघाटी झाली आणि त्यानंतर सप्टेंबर १९४७ मध्ये मणिपूर संस्थानाचे संस्थान भारतामध्ये सामील करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली. मणिपूर हे नैसर्गिक साधनसंपत्तीने नटलेले आहे. मणिपूरच्या एकूण लोकसंख्येतील ४१ टक्के लोकसंख्या ही आदिवासी पाड्यामध्ये असल्याचे पाहायला मिळते. त्यात मणिपुरी लोक ५३ टक्के, विविध नागा जमाती २४ टक्केआणि कुकी-झो जमाली १६ टक्के आहेत. अनेक आदिवासी जमाती एकाच ठिकाणी जवळ-जवळ राहत असल्याने फार पूर्वीपासून या जमातींमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन संघर्ष पाहायला मिळत आहे. त्यातही तेथे कुकी आणि मतैई या दोन समुदायांमध्ये अनेक कारणांवरुन वाद आहे.


हा वाद मागील काही महिन्यांपासून फार वाढला असल्याचे चित्र दिसते. जुलै २०२३ मध्ये कुकी समुदायाच्या दोन महिलांची विवस्त्र धिंड काढण्यात आली. या भयानक प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर गेल्याने मणिपूरमधील स्थितीचे गांभीर्य सर्वांना कळाले. या दोन समुदायातील संघर्षामुळे खूप काळापासून मणिपूरमध्ये असंतोष आहे. या प्रकरणावर नियंत्रण मिळवण्यासाठी तेथील राज्य सरकारसह केंद्र सरकार प्रयत्न करत आहे.


Read More
congress india bloc will raise manipur issue with full force in parliament says rahul gandhi
मणिपूर मुद्द्यावर सरकारवर दबाब आणू; राहुल गांधी यांचे आश्वासन, पंतप्रधानांवर पुन्हा टीका

मणिपूरमधील त्यांच्या मुक्कामादरम्यान, राहुल गांधींनी राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांतील तीन मदत छावण्यांना भेट दिली.

Congress MP Rahul Gandhi
“मणिपूरमध्ये जे घडतंय ते देशात कुठेही पाहिलं नाही, मोदींनी एकदा…”, राहुल गांधींचं पंतप्रधानांना आवाहन

विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधी यांचा मणिपूरचा हा पहिलाच दौरा असणार आहे.

rahul gandhi manipur visit
राहुल गांधींच्या मणिपूर दौर्‍यामागचा नेमका उद्देश काय? या दौर्‍यामुळे भाजपावर दबाव वाढणार का?

लोकसभेतील गदारोळानंतर राहुल गांधी आता मणिपूर दौर्‍यावर निघाले आहेत. विरोधी पक्षनेता म्हणून मणिपूर येथील त्यांचा हा पहिलाच दौरा असणार आहे.

PM Modi talks of 10 times Manipur has been under President rule
काँग्रेसने मणिपूरमध्ये १० वेळा राष्ट्रपती राजवट लागू केल्याचे मोदींचे वक्तव्य; काय आहे इतिहास?

पंतप्रधान मोदी मणिपूरबाबत साधा ‘ब्र’ही का उच्चारत नाहीत, असा सवाल करणाऱ्या विरोधकांना पंतप्रधान मोदींनी संसदेमध्ये उत्तर दिले आहे.

Manipur crisis PM Narendra Modi hits back in Rajya Sabha Opposition
“हिंसाचारावरुन राजकारण करणाऱ्यांना मणिपूरची जनता नाकारेल”; अखेर मणिपूरबाबत मोदींनी केले भाष्य

आज बुधवारी (३ जुलै) पंतप्रधान मोदी राज्यसभेमध्ये बोलत होते. तेव्हा ते म्हणाले की, मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांचे सरकार सर्वोतोपरी…

Narendra Modi
“…तर आम्ही संसदीय लोकशाहीचं रक्षण करू शकणार नाही”, पंतप्रधान मोदींची विरोधकांवर टीका; सभागृहात नेमकं काय घडलं?

गेल्या वर्षभरापासून मणिपूर धगधगतंय, मात्र नरेंद्र मोदी अद्याप सभागृहात यावर एकही शब्द बोललेले नाहीत.

Loksatta anvyarth Violent ethnic conflict in Manipur Home Ministership
अन्वयार्थ: एवढा विलंब का लागला?

मणिपूरमधील हिंसक वांशिक संघर्षाला वर्ष उलटल्यावर केंद्रीय गृहमंत्रीपदाची पुन्हा सूत्रे हाती घेतलेल्या अमित शहा यांनी मैतेई आणि कुकी या दोन्ही समजांच्या…

A meeting chaired by Amit Shah regarding Manipur
मैतेई, कुकींबरोबर लवकरच चर्चा; मणिपूरबाबत शहा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

मणिपूरमधील मैतेई आणि कुकी समाजांबरोबर लवकरच चर्चा करेल व त्यांच्यातील वांशिक दरी कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री…

supriya sule on manipur conflict
“मणिपूर भारताचा महत्त्वाचा भाग, काल परवाच तिथे…”; मोहन भागवतांच्या विधानानंतर सुप्रिया सुळेंची मोदी सरकारवर टीका!

मणिपूरमधील या परिस्थितीबाबत काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही अप्रत्यक्षपणे मोदी सराकरला लक्ष्य केलं होतं.

What Mohan Bhagwat Said About Manipur?
मोहन भागवत यांचा सरकारला सल्ला, “वर्षभरापासून मणिपूर जळतं आहे, त्याकडे…”

मोहन भागवत यांनी मणिपूरचा विषय त्यांच्या भाषणात उपस्थित केला, तसंच निवडणूक म्हणजे स्पर्धा असते लढाई नाही असंही मोहन भागवत म्हणाले.

Manipur chief minister
मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; एक सुरक्षा रक्षक जखमी

६ जून रोजी अज्ञात हल्लेखोरांनी जिरीबामध्ये एका व्यक्तीची हत्या केली होती. तेव्हापासून जिरीबाममध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळला होता. त्यामुळे या…

Tension again in Manipur Police posts targeted by militants
मणिपूरमध्ये पुन्हा तणाव; अतिरेक्यांकडून पोलीस चौक्या लक्ष्य; किमान ७० घरांना आग

मणिपूरच्या जिरीबाम जिल्ह्यात संशयित अतिरेक्यांनी दोन पोलीस चौक्या, वन विभागाचे एक कार्यालय आणि किमान ७० घरे जाळली आहेत, अशी माहिती पोलीस…

संबंधित बातम्या