scorecardresearch

मणिपूर

मणिपूर (Manipur) हे भारताच्या ईशान्य भागातील एक राज्य आहे. ईशान्येकडच्या सात राज्यांपैकी मणिपूर हे महत्त्वपूर्ण राज्य आहे. या राज्याच्या उत्तरेस नागालॅंड, दक्षिण भागाला मिझोराम, पश्चिमेस आसाम ही राज्ये आहेत. मणिपूरची पूर्वेची सीमा ही म्यानमार देशाला संलग्न आहे. इंफाळ हे मणिपूरमधील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर मणिपूरची राजधानीदेखील आहे. या राज्याचे क्षेत्रफण २२.३२७ चौ.किमी इतके आहे. तेथे मणिपुरी ही प्रमुख भाषा असली तरी तेथे अन्य भाषाही बोलल्या जातात. त्यामध्ये काही आदिवासी भाषांचा सुद्धा समावेश आहे. ब्रिटीश काळात मणिपूर हे एक संस्थान होते. संपूर्ण देशामध्ये स्वातंत्र्यलढा सुरु असताना या भागात देखील स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले होते.


१९३० च्या उत्तरार्धामध्ये राज्यातील नागरिकांनी भारतीय संघराज्यामध्ये सहभागी होण्याची इच्छा प्रकट केली. पुढे १९३९ मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी विलीनीकरणावर वाटाघाटी झाली आणि त्यानंतर सप्टेंबर १९४७ मध्ये मणिपूर संस्थानाचे संस्थान भारतामध्ये सामील करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली. मणिपूर हे नैसर्गिक साधनसंपत्तीने नटलेले आहे. मणिपूरच्या एकूण लोकसंख्येतील ४१ टक्के लोकसंख्या ही आदिवासी पाड्यामध्ये असल्याचे पाहायला मिळते. त्यात मणिपुरी लोक ५३ टक्के, विविध नागा जमाती २४ टक्केआणि कुकी-झो जमाली १६ टक्के आहेत. अनेक आदिवासी जमाती एकाच ठिकाणी जवळ-जवळ राहत असल्याने फार पूर्वीपासून या जमातींमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन संघर्ष पाहायला मिळत आहे. त्यातही तेथे कुकी आणि मतैई या दोन समुदायांमध्ये अनेक कारणांवरुन वाद आहे.


हा वाद मागील काही महिन्यांपासून फार वाढला असल्याचे चित्र दिसते. जुलै २०२३ मध्ये कुकी समुदायाच्या दोन महिलांची विवस्त्र धिंड काढण्यात आली. या भयानक प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर गेल्याने मणिपूरमधील स्थितीचे गांभीर्य सर्वांना कळाले. या दोन समुदायातील संघर्षामुळे खूप काळापासून मणिपूरमध्ये असंतोष आहे. या प्रकरणावर नियंत्रण मिळवण्यासाठी तेथील राज्य सरकारसह केंद्र सरकार प्रयत्न करत आहे.


Read More
350 rebels arrested in Manipur anti extortion operation by security forces
मणिपुरात ३५० बंडखोरांना अटक; वैवाहिक, संपत्तीच्या वादावर खंडणीखोर टोळ्यांचे लक्ष

मणिपूरमध्ये सुरक्षा दलांनी खंडणीखोर टोळ्यांविरुद्ध केलेल्या कारवाईत ३५०हून अधिक बंडखोरांना अटक केली आहे.

Manipur 10 terrorist killed
मणिपूरमध्ये चकमकीत १० दहशतवाद्यांचा खात्मा

चंदेल जिल्ह्यातील खेंगजोय तहसीलमधील न्यू समताल गावाजवळ सशस्त्र व्यक्तींच्या हालचालींबद्दल विशिष्ट गुप्त माहितीवरून आसाम रायफल्स युनिटने १४ मे रोजी कारवाई…

Waqf Amendment Bill BJP Minority Front leaders house
Waqf Amendment Bill : वक्फ विधेयकाला पाठिंबा दिल्याने भाजपाच्या अल्पसंख्याक मोर्चाच्या नेत्याचं घर पेटवलं, नेमकं काय घडलं?

अस्कर अली मक्कामय्युम यांच्या निवासस्थानाची तोडफोड करत घराला आग लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Manipur Discussion in Loksabha
Manipur Conflict : ‘वक्फ’साठी १४ तास अन् मणिपूरसाठी फक्त ४१ मिनिटे; लोकसभेत रात्री २ वाजता ‘राष्ट्रपती राजवट’वर नेमकी चर्चा काय? प्रीमियम स्टोरी

वक्फ विधेयक मंजूर झाल्यानंतर लगेचच केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू…

Manipur , violence , peace , President rule,
मणिपुरात केंद्र सरकारही हडेलहप्पीच करणार?

… कुकी समाजाने महामार्ग अडवले. हिंसाचारात बळीसुद्धा गेला. तरीदेखील सुरक्षादलांचा बंदोबस्त प्रत्येक काफिल्याला देऊन केंद्र सरकार ‘महामार्ग सुरू केलाच’ हे…

Manipur violence
मणिपूरमध्ये जनजीवन विस्कळीत, कुकीबहुल भागात बेमुदत बंदचे आवाहन

कांगपोकपी जिल्ह्यामध्ये कुकी निदर्शक आणि सुरक्षा दलांमध्ये शनिवारी झालेल्या संघर्षामध्ये किमान एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि अन्य ४० जण जखमी…

Manipur violence loksatta
मणिपूरमध्ये संघर्षात एक ठार, केंद्र सरकारच्या निर्देशांविरोधात कुकींची निदर्शने; २५ जखमी

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेल्या राज्यभरात मुक्त हालचाली निर्देशांना विरोध करण्यासाठी कुकी गटाने निदर्शने केली.

मणिपूरचं भवितव्य काय असणार; गृहमंत्री घेणार बैठक

गृहमंत्री सुरक्षेबाबत पाहणी करणार असल्याचे सांगितले जात आहे. तसंच या बैठकीत गव्हर्नर अजय कुमार भल्ला, मणिपूर सरकारमधील वरिष्ठ अधिकारी, सैन्यदलातील…

Manipur latest news in marathi
विश्लेषण : मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट… मात्र विधानसभा स्थगित… म्हणजे काय?

स्थगित विधानसभा पुनर्स्थापित करण्यास कोणत्याही मुदतीचे बंधन नसते. राजकीय मतैक्य झाल्यावर स्थगित असलेली विधानसभा पुनर्स्थापित करता येते. विधानसभा पुन्हा कार्यान्वित…

Manipur
CRPF जवानाच्या गोळीबारात दोघांचा मृत्यू, नंतर केली आत्महत्या; मणिपूरमध्ये नेमकं काय घडलं?

ही घटना रात्री ८ वाजताच्या सुमारास इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील लामफेल येथील केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) छावणीत घडली.

President’s Rule In Manipur : धगधगत्या मणिपूरमध्ये अखेर राष्ट्रपती राजवट लागू, मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वीच सोडलं होतं पद

मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या