पीटीआय, सिलिगुडी

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी रविवारी पुन्हा एकदा भाजपवर हल्लाबोल करताना देशभरात द्वेष, हिंसाचार पसरवला जात असल्याचा आरोप केला. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर ‘भारत जोडो न्याय यात्रा’ पुढे सुरू झाली.पश्चिम बंगालमधील सिलिगुडी येथे यात्रेदरम्यान भाषण करताना राहुल म्हणाले की, केंद्र सरकारने अग्निवीर योजना, अल्पकालीन भरती योजना सुरू करून सैन्य दलात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या तरुणांची थट्टा केली आहे. देशभर द्वेष आणि हिंसाचार पसरवला जात आहे. त्याचा कोणताही हेतू साध्य होणार नाही.

narendra modi
धर्माच्या आधारावर आरक्षणाचा प्रयत्न! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर आरोप
What Sharad Pawar Said About Modi?
“मोदींच्या विरोधात लोकांमध्ये रोष असल्यानेच आता भाजपा हिंदू-मुस्लिम..”, शरद पवारांचा हल्लाबोल
Manifesto of Samajwadi Party released
हमीभावासाठी कायदा करण्याचे आश्वासन; समाजवादी पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित
Supriya Sule, Sharad Pawar,
भाजपचे एकच स्वप्न, शरद पवारांना संपवणे; सुप्रिया सुळेंचा पुनरुच्चार

द्वेष पसरवण्याऐवजी, आपल्याला आपल्या तरुणांसाठी प्रेम आणि न्याय देण्याचे काम केले पाहिजे. केंद्र सरकार केवळ बडय़ा कंपन्यांसाठी काम करत आहे, गरिबांसाठी नाही या आरोपाचा त्यांनी पुनरुच्चार केला. पश्चिम बंगालमध्ये यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाल्याबद्दल राहुल यांनी कृतज्ञता व्यक्त केली.