दोन दिवसांपूर्वी दूरदर्शनच्या लोगोचा रंग बदलण्यात आल्यामुळे त्यावरून मोठी चर्चा पाहायला मिळाली. या रंगबदलावर प्रामुख्याने राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटल्या. दूरदर्शनचे विद्यमान कार्यकारी संचालक गौरव द्विवेदी यांनी हा बदल राजकीय घटनांशी संबंधित असल्याचा दावा फेटाळून लावला आहे. मात्र, त्याचवेळी दूरदर्शनची प्रमुख संस्था असणाऱ्या प्रसार भारतीचे माजी सीईओ आणि तृणमूल काँग्रेसचे विद्यमान राज्यसभा खासदार जव्हार सरकार यांनी या बदलावर परखड शब्दांत हल्लाबोल केला आहे.

नेमका काय बदल केला आहे?

डीडीनं मंगळवारी यासंदर्भात एक्सवर (ट्विटर) माहिती दिली. “आमची तत्त्व तीच आहेत, पण आता आम्ही नव्या स्वरूपात येत आहोत. याआधी कधीही नव्हतं, असं बातम्यांचं स्वरूप आता येत आहे. वेगापेक्षा नेमकेपणा, दाव्यांपेक्षा तथ्य आणि चर्चांपेक्षा सत्य सादर करण्याची हिंमत आमच्यात आहे. कारण जर एखादं वृत्त दूरदर्शनवर आहे, तर मग ते सत्य असणारच. डीडी न्यूज, सत्याचा विश्वास”, असं या पोस्टमध्ये डीडीनं नमूद केलं होतं. त्यासह डीडीच्या न्यूजरूममधील एक व्हिडीओही नव्या लोगोसह शेअर करण्यात आला आहे.

pm narendra modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितली जाहीर माफी, शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी खेद व्यक्त करताना म्हणाले…
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
congress welcomes president Draupadi murmu
राष्ट्रपतींनी संपूर्ण देशाचा आक्रोश व्यक्त करावा! महिला अत्याचारसंबंधी द्रौपदी मुर्मू यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसची अपेक्षा
Prime Minister Narendra Modi statement on Jan Dhan Yojana
‘जन धन’ योजना राष्ट्रनिर्माणात सहभागाच्या संधीचे प्रतीक -पंतप्रधान
Congress is involve in dispute between two factions of BJP Nagpur news
भाजपच्या दोन गटातील वादात काँग्रेसची उडी, काय आहे प्रकार
Loksatta vyaktivedh Army Chief General Sundararajan Padmanabhan Terrorist attack army
व्यक्तिवेध: जनरल (नि.) एस. पद्मानाभन
Madhavi Buch : हिंडेनबर्ग रिसर्चच्या आरोपांवर सेबीच्या अध्यक्षा माधवी बुच यांचे स्पष्टीकरण; म्हणाल्या, “आमचे सर्व आर्थिक व्यवहार…”
loksatta analysis wayanad disaster in light of gadgill commission report
पश्चिम घाट पर्यावरण संवर्धनासंदर्भात माधव गाडगीळ समिती अहवाल काय आहे? अहवालाकडे दुर्लक्षामुळेच वायनाडमध्ये प्रलय? 

काय म्हणाले जव्हार सरकार?

दरम्यान, या लोगोच्या रंगबदलाबाबत प्रसार भारतीचे २०१२ ते २०१४ या काळात कार्यकारी संचालक राहिलेले जव्हार सरकार यांनी टीका केली आहे. “नॅशनल ब्रॉडकास्टर दूरदर्शननं ऐतिहासिक लोगोचा रंग बदलून भगवा केला आहे. दूरदर्शनचा माजी सीईओ म्हणून मी त्यांचं भगवीकरण मोठ्या काळजीनं पाहात आलोय. आता मला वाटतंय की हे प्रसार भारती नसून प्रचार भारती आहे”, असं जव्हार रकार यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

‘हे तर सरकारी माध्यमांचे भगवीकरण’, डीडी न्यूजच्या लोगोचा रंग केशरी केल्यानंतर विरोधकांची टीका

“हे सरळ सरळ निवडणूक मार्गदर्शक तत्त्वांचं उल्लंघन”

“डीडीनं भगवा रंग आपल्या ब्रँडिंगसाठी निवडणं चुकीचं आहे. त्याला कुणी केशरी म्हणत असेल, कुणी आणखी काही म्हणत असेल. पण या रंगाचा प्रस्थापित संदर्भ सध्या एका धर्माशी जोडला जातो. प्रसारभारतीची पोहोच व्यापक स्तरावर देशात आहे. याचा वापर एका धर्माचा रंग पसरवण्यासाठी वापरणं चुकीचं आहे. देशाच्या राष्ट्रध्वजातही हा रंग आहे, पण त्यासोबत इतर रंगही आहेत. हे सरळ सरळ निवडणूक मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन आहे”, असा थेट आरोप सरकार यांनी व्हिडीओमध्ये केला आहे.

दरम्यान, याबाबत इंडियन एक्स्प्रेसनं त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. “इथे मुद्दा फक्त लोगोचा नाही. दूरदर्शनचं आता सगळंच भगवं झालं आहे. सत्ताधारी पक्षाच्या कार्यक्रमांना तिथे सर्वाधिक प्रक्षेपण काळ (एअरटाईम) मिळतो, तर विरोधी पक्षांना क्वचितच तिथे जागा मिळते. राज्यसभेच्या हॉलमधील रंगही बदलून भगवा होत आहे”, असं सरकार म्हणाले.