शेती कायद्यांच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीच्या निष्पक्षतेबाबत शंका घेतली जात असून शेतकरी संघटनांनी समितीशी चर्चा करण्यासही नकार दिला आहे. ‘शेतकऱ्यांच्या प्रश्नावर समितीचा पर्याय असू शकतो पण, सदस्यांची तटस्थता तरी तपासून पाहायला हवी होती. सर्व सदस्यांनी शेती कायद्यांचे समर्थन केले असेल तर शेतकऱ्यांशी चर्चा करून काय साधणार’, असा सवाल माजी केंद्रीय कृषिराज्यमंत्री सोमपाल शास्त्री यांनी लोकसत्ताशी बोलताना उपस्थित केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सर्वोच्च न्यायालयाने नव्या शेती कायद्यांना हंगामी स्थगिती देताना चार सदस्यांची समितीही नियुक्त केली आहे. त्यात, भारतीय किसान युनियनचे प्रमुख भूपिंदर सिंग मान, शेतकरी संघटनेचे प्रमुख अनिल घनवट, शेतीतज्ज्ञ अशोक गुलाटी व प्रमोद कुमार जोशी हे सदस्य आहेत. मान व घनवट या दोन्ही नेत्यांनी शेती कायद्यांना पाठिंबा दिला आहे. गुलाटी व जोशी हे दोघे शेती क्षेत्रांतील बदलांसाठी कायद्यांना अनुकूल आहेत. ‘हे सर्व सदस्य केंद्राच्या शेती धोरणांचे समर्थन करणारे असतील तर समिती एकतर्फी भूमिका ठरवण्याचा धोका आहे. त्यामुळे या समितीशी चर्चा न करण्याचा शेतकरी संघटनांचा निर्णय चुकीचा नसेल’, असे मत शास्त्री यांनी मांडले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diagnosis committee is fair comment by former agriculture minister sompal shastri abn
First published on: 14-01-2021 at 00:12 IST