हरियाणातील सिंघू सीमेवर आंदोलनादरम्यान एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे पोलिसांनी सांगितले. शवविच्छेदनानंतर अधिक तपशील शेअर केला जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
केंद्राच्या तीन वादग्रस्त शेती कायद्यांचा निषेध करण्यासाठी सोमवारी संयुक्त किसान मोर्चाने पुकारलेल्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी दिल्लीच्या सीमावर्ती भागात सुरक्षा वाढवली आहे.
सिंघू सीमेवरील शेतकऱ्यांनी दिल्ली-हरियाणा मार्गावरील १४ प्रवेश आणि निर्गमन स्थाने बंद केल्याने प्रवाशांनाही अडचणी येत आहेत.
आंदोलनामुळे दिल्ली-गुरुग्राम सीमेवर वाहतूक कोंडीही झाली. सीमेवर अनेक वाहने अडकलेली दिसली.
शेतकरी हरियाणातील बहादूरगढ रेल्वे स्टेशनवर पोहोचले जेथे त्यांनी रेल्वे रुळांवर घोषणा दिल्या.एका शेतकऱ्याने सांगितले की शंभू सीमा (पंजाब-हरियाणा सीमा) देखील संध्याकाळी ४ पर्यंत बंद करण्यात आली आहे. अनेक पक्षांनी देशव्यापी १० तासांच्या संपाला पाठिंबा दिला आहे. एसकेएमने रविवारी बंद दरम्यान संपूर्ण शांततेचे आवाहन केले आणि सर्व भारतीयांना संपात सामील होण्याचे आवाहन केले.