छत्तीसगडच्या कावर्धा जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. कुकडूर पोलीस ठाणे क्षेत्रातील बहपनी गावाजवळ पिकअप ट्रक खड्ड्यात पडल्याने १५ मजूर ठार झाले आहेत. यामध्ये १४ महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. ANI ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

पिकअप ट्रकमध्ये तेंदूपत्ता गोळा करून परतत असलेले २५ मजूर होते. ट्रक खड्ड्यात पडल्याने २५ जण खड्ड्यात पडले. यामध्ये १४ महिला आणि एका पुरुषाचा मृत्यू झाला. तर आठ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती कावर्धाचे पोलीस अधिक्षक अभिषेक पल्लव यांनी दिली.

Aarey - BKC Underground Metro Inauguration,
आरे – बीकेसी भुयारी मेट्रो लोकार्पण : विरोधकांनी प्रकल्प रोखल्याने ‘मेट्रो ३’चा खर्च १४ हजार कोटींनी वाढला – पंतप्रधान मोदी
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Narendra Modi Thane, Narendra Modi Ghodbunder,
विकासशत्रू महाविकास आघाडीला रोखा – पंतप्रधान नरेंद्र मोदी
PM Modi visit Thane on Saturday Mahayutti office bearers defaced Ghodbunder with placards
पंतप्रधानांच्या सभेपूर्वी घोडबंदर विद्रुप, मोदी हेलेकाॅप्टरने येणार तरीही अतिउत्साही पदाधिकाऱ्यांची घोडबंदरभर फलकबाजी
mayur mundhe quits bjp
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मंदिर बांधणाऱ्या ‘त्या’ भाजपा कार्यकर्त्याची पक्षाला सोडचिठ्ठी; दिलं ‘हे’ कारण
Ajit Pawar demand to BJP regarding the post of Chief Minister print politics news
मुख्यमंत्रीपद ‘फिरते’ हवे? अजित पवार यांची भाजपकडे मागणी
Jagan Mohan Reddy
नायडूंना खोटे बोलण्याची सवयच, जगन मोहन रेड्डी यांचे मोदींना पत्र; मुख्यमंत्र्यांवर थेट आरोप
Narendra Modi Wardha, PM Narendra Modi,
पंतप्रधानांचा दौरा आणि सुरक्षेचा फास, शाळांना सुट्टी व नागरिक घरात

हेही वाचा >> भारतीय वंशाच्या व्यक्तीचं पहिलंवहिलं अंतराळ पर्यटन; किती येतो खर्च?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला शोक

या घटनेवरून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शोक व्यक्त केला आहे. “कावर्धा, छत्तीसगड येथे झालेला रस्ता अपघात अत्यंत वेदनादायी आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्याबद्दल माझ्या संवेदना आहेत. यासोबतच सर्व जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो. राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासन पीडितांना सर्वतोपरी मदत करतील”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

तर, छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनीही शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, “कावर्धा येथे कामगारांनी भरलेलं पिकअप वाहन उलटल्याने १५ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी वेदनादायी आहे. या अपघतातात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्या सर्व कुटुंबांसोबत माझ्या संवेदना आहेत. पीडितांच्या कुटुंबीयांना विलंब न करता भरपाई द्यावी, अशी मी मागणी सरकारकडे केली आहे.”