सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी कोणती पावले उचलावीत, यासंबंधी भारत आणि चीन यांच्या शिष्टमंडळांमध्ये सोमवारी चर्चेची पाचवी फेरी सुरू झाली. त्यानंतर उभय देशांच्या विशेष दूतांमध्ये यासंदर्भात विचारविनिमय होणार आहे. उभय देशांच्या अधिकाऱ्यांची चर्चा अत्यंत सौहार्दपूर्ण आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला. या बैठकीत भारत आणि चीन सीमेवरील घडामोडींचा आढावा घेण्यात आला. सीमा संरक्षण सहकार्य कराराची अंमलबजावणी करण्यावरही शिष्टमंडळांनी भर दिला. याखेरीज सीमेवर शांतता आणि सलोखा प्रस्थापित करण्याचे उभयतांनी मान्य केले. उभय देशांमधील सैनिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याच्या दृष्टीने एका कार्यकारी गटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला.
संग्रहित लेख, दिनांक 11th Feb 2014 रोजी प्रकाशित
भारत, चीन यांच्यात सीमाप्रश्नी चर्चा सुरू
सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी कोणती पावले उचलावीत, यासंबंधी भारत आणि चीन यांच्या शिष्टमंडळांमध्ये सोमवारी चर्चेची पाचवी फेरी सुरू झाली.
First published on: 11-02-2014 at 12:48 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India china set to discuss border issue