मालदीव सरकारने येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नूतनीकरणाचा प्रकल्प भारतीय कंपनीकडून काढून घेतल्यामुळे भारत सरकारने मालदीवला दिली जाणारी आर्थिक मदत थांबविली आहे. विशेष म्हणजे, सिंगापूर उच्च न्यायालयाने या प्रकरणांत भारतीय कंपनीच्या बाजूने कौल दिला असूनही मालदीव सरकारने ही भूमिका घेतली होती. मालदीव सरकारने इब्राहीम नासिर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नूतनीकरणाचे ५० कोटी डॉलर्सचे कंत्राट जीएमआर या भारतीय कंपनीला दिले होते. मात्र हे कंत्राट अचानकपणे काढून घेण्यात आले. गेल्याच आठवडय़ात मालदीव सरकारचा हा निर्णय सिंगापूर उच्च न्यायालयाने अवैध ठरविला. मात्र असे असूनही न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी करण्यात मालदीव सरकार टाळाटाळ करीत होते. त्यामुळे अखेर भारताने आर्थिक मदत थांबविण्याचा निर्णय घेतला.
संग्रहित लेख, दिनांक 4th Dec 2012 रोजी प्रकाशित
भारताने मालदीवचे अर्थसहाय्य रोखले
मालदीव सरकारने येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नूतनीकरणाचा प्रकल्प भारतीय कंपनीकडून काढून घेतल्यामुळे भारत सरकारने मालदीवला दिली जाणारी आर्थिक मदत थांबविली आहे.
First published on: 04-12-2012 at 02:45 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India stop maldive financial help