पीटीआय, नवी दिल्ली : भारत-चीन सीमावादाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांनी ही समस्या सोडविण्याच्या दृष्टीने बीजिंगमध्ये बुधवारी एका बैठकीचे आयोजन केले होते. परराष्ट्र मंत्रालयाने यासंबंधीची माहिती दिली. या बैठकीत दोन्ही देशांनी परराष्ट्र मंत्रालय आणि सैन्यदलाच्या माध्यमातून सीमाभागातील क्षेत्रांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सहमती दर्शविली.

परराष्ट्र मंत्रालयाचे संयुक्त सचिवांनी (पूर्व आशिया) भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. भारत-चीन सीमा व्यवहार (डब्ल्यूएमसीसी) वर सल्लामसलत आणि समन्वयासाठी या २९ व्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. दोन्ही बाजूंनी शांततेसाठी कोणते प्रयत्न करावेत आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील उर्वरित समस्यांचे निराकरण कसे करावे यावर या बैठकीत सखोल विचार विनिमय करण्यात आला. परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी ही माहिती दिली. चिनी शिष्टमंडळाचे नेतृत्व चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या सीमा आणि सागरी विभागाचे महासंचालक हाँग लिआंग करत होते, असे परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

joi biden
अन्वयार्थ: बायडेन प्रशासनाचा नैतिक विजय..
Court Grants Pre Arrest Bail, Rashtriya Swayamsevak Sangh, name misusing Case, rss name misusing Case, Pre Arrest Bail, rss, marathi news, nagpur news,
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नावाचा दुरुपयोग, न्यायालय म्हणाले…
25 prominent politicians joined BJP
आधी भ्रष्टाचाराच्या आरोपांनी ‘कलंकित’; भाजपमध्ये येताच ‘चकचकीत’
Wardha Lok Sabha
राष्ट्रवादी २५ वर्षांनंतर पुन्हा वर्ध्याच्या रिंगणात

हेही वाचा >>>‘घाबरवणं-धमकावणं ही काँग्रेसची संस्कृती’, सरन्यायाधीशांना लिहिलेल्या पत्रावर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया

दोन्ही बाजूंनी राजनैतिक आणि लष्करी माध्यमातून नियमित संपर्क राखण्यासाठी आणि विद्यमान द्विपक्षीय करार आणि शिष्टाचारानुसार सीमावर्ती भागात जमिनीवर शांतता आणि शांतता राखण्यासाठी सहमती दर्शविली. दरम्यान, चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने गुरुवारी एका निवेदनात म्हटले आहे की, ‘‘दोन्ही बाजूंनी चीन-भारत सीमा भागातील परिस्थितीचे व्यवस्थापन आणि नियंत्रणामध्ये झालेल्या प्रगतीचे सकारात्मक मूल्यांकन केले आणि पुढील टप्प्यासाठी कामाच्या कल्पनांवर विचारांची देवाणघेवाण केली. दोन्ही बाजूंनी सीमेवरील जमिनीवरील संबंधित मुद्दय़ांवर लक्ष केंद्रित करणे, शक्य तितक्या लवकर दोन्ही बाजूंना स्वीकारार्ह तोडगा काढणे आणि सीमेवरील परिस्थितीचे नियंत्रण आणि व्यवस्थापनाला प्रोत्साहन देण्याचे मान्य केले.’’

शांततेसाठी चर्चा

दोन्ही बाजूंनी शांततेसाठी कोणते प्रयत्न करावेत आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील उर्वरित समस्यांचे निराकरण कसे करावे यावर या बैठकीत सखोल विचार विनिमय करण्यात आला.