पीटीआय, नवी दिल्ली

आगामी जनगणनेत इतर मागासवर्गीयांसाठी (ओबीसी) जातनिहाय जनगणना करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि अन्य संबंधितांकडून उत्तर मागितले आहे.सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा यांच्या खंडपीठाने केंद्र, सामाजिक न्याय मंत्रालय आणि इतरांना नोटीस बजावून त्यांचे उत्तर मागितले आहे. याच प्रकरणी यापूर्वी प्रलंबित असलेल्या याचिका खंडपीठाने संलग्न केल्या आहेत .

supreme court
सर्वोच्च न्यायालयाचे डिजिटायझेशन; व्हॉट्सअ‍ॅपद्वारे खटले, सूचीबद्ध प्रकरणांची माहिती
The Supreme Court asked the central government why it stopped the action against fraudulent advertisements
फसव्या जाहिरातींवरील कारवाई का रोखली? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल
supreme court
नुकसानभरपाईच्या पुनरावलोकनाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; हवाई दल अधिकाऱ्याला एचआयव्ही संसर्ग
Government failure to take action against misleading companies Supreme Court verdict on Patanjali case
दिशाभूल करणाऱ्या कंपन्यांवर कारवाईबाबत सरकार अपयशी; पतंजली प्रकरणावरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशोरे

सर्वोच्च न्यायालयात वकील कृष्णकन्हैया पाल यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू होती. या याचिकेत नमूद केले आहे, की जातनिहाय सर्वेक्षण आणि जात आधारित जनगणनेच्या अभावामुळे सरकार मागासवर्गीयांमधील सर्व घटकांना कल्याणकारी योजनांचे लाभ योग्यरीत्या देऊ शकत नाही. इतर मागासवर्गीयांसाठी हे अत्यंत गरजेचे आहे. या संदर्भात योग्य आकडेवारीची माहिती नसल्याने निश्चित धोरणे आखता येत नाहीत, असा युक्तिवादही या याचिकेत करण्यात आला होता.

पाल यांनी नमूद केले, की २०१८ मध्ये तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी २०२१ च्या जनगणनेदरम्यान ‘ओबीसी’ लोकसंख्येची गणना केली जाईल, असे जाहीर केले होते. तथापि सरकारने या संदर्भात २०१७ मध्ये स्थापन केलेल्या रोहिणी आयोगाचा अहवाल सादर करण्याचे टाळले.