अलिराजपूर : भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) यंदाच्या लोकसभा निवडणुकीत १५० जागाही मिळणार नाहीत, असा दावा करत भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बदलू इच्छित असलेले संविधान वाचवणे, हेच या निवडणुकीचे उद्दिष्ट असल्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. मध्य प्रदेशातील रतलाम-झाबुआ लोकसभा मतदारसंघातील अलिराजपूर जिल्ह्यातील जोबत शहर येथे प्रचार सभेत राहुल गांधी यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. काँग्रेस सरकार नागरिकांच्या हितासाठी आरक्षणावरील ५० टक्क्यांची मर्यादा हटवेल, असे राहुल गांधींनी यावेळी सांगितले. ते पुढे म्हणाले.

की, जातीवर आधारित जनगणना केल्याने लोकांची सद्या:स्थिती समोर येईल आणि देशातील राजकारणाची दिशाही बदलेल. परंतु भाजप नेते स्पष्टपणे म्हणतात की संविधान बदलले जाईल. त्यासाठीच ते ‘अब की बार चारसौ पार’चा नारा देत आहेत. पण हा नारा बाजूला ठेवा, त्यांना यंदाच्या निवडणुकीत १५० जागाही जिंकता येणार नाहीत, असा दावाही राहुल यांनी केला. ही निवडणूक संविधानाचे रक्षण करण्यासाठीच असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

pm modi on prajwal revanna sex tape row
प्रज्वल रेवण्णा प्रकरणावर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं भाष्य; म्हणाले…
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
uddhav thackeray viral video
शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बाहेर जायला सांगितलं, ठाकरेंनी हात जोडले अन्..; भाजपाने शेअर केला ‘तो’ VIDEO
PM Modi says BJD govt will expire in Odisha after Assembly poll
बीजेडी सरकार ४ जूननंतर कालबाह्य; ओडिशातील प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दावा
Radhika Khera congress
“रात्री नशेत असताना ते…”, राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप करत राधिका खेरांचा राजीनामा
sharad pawar ajit pawar marathi news
“माझे बंधू आजारी असताना शेवटच्या काळात…”, शरद पवारांची अजित पवारांवर थेट टीका: म्हणाले…
Sunita Williams' 3rd Mission To Space Called Off
सुनीता विल्यम्स यांची तिसरी अंतराळ मोहीम रद्द, ‘हे’ आहे कारण
Uddhav Thackeray On Narendra Modi
उद्धव ठाकरेंचं मोदींना प्रत्युत्तर; म्हणाले, “आजारपणात माझी चौकशी करता अन् तुमचे पाव उपमुख्यमंत्री…”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नागरिकांचे घटनात्मक अधिकार, आदिवासी, दलित आणि इतर मागासवर्गीयांचे आरक्षण काढून घ्यायचे आहे, असा दावा राहुल यांनी केला.

हेही वाचा >>> सुनीता विल्यम्स तिसऱ्यांदा अंतराळात जाण्यासाठी सज्ज

कोट्यवधी लोकांना लखपतीकरणार

‘इंडिया’ आघाडी सत्तेत आल्यास आदिवासी, दलित, इतर मागासवर्गीय आणि सर्वसामान्य जातीतील गरिबांच्या उत्थानासाठी जात-आधारित जनगणना आणि आर्थिक जनगणना केली जाईल. हे एक क्रांतिकारक पाऊल असेल, असे राहुल गांधी म्हणाले. काँग्रेसला देशातील कोट्यवधी जनतेला ‘लखपती’ करायचे आहे. पंतप्रधान मोदी केवळ २२ अब्जाधीशांची काळजी घेतात आणि त्यांचे कर्ज माफ करतात, असा आरोपही केला.