लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : नवभारत साक्षरता अभियानाअंतर्गत राज्यभरात घेण्यात आलेल्या ‘पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान’ परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. त्यात ९२.६८ टक्के नवसाक्षर उत्तीर्ण झाले असून, ७.३२ टक्के नवसाक्षरांमध्ये सुधारणा आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

CET, new colleges in third round, CET news,
तिसऱ्या फेरीत नव्या महाविद्यालयांतील जागांचा समावेश ? सीईटी कक्षाचे संकेत; दुसऱ्या फेरीला ६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Sudhir Mungantiwar, tigers, forest,
मुनगंटीवार म्हणतात, जंगलातील वाघांना स्थलांतरित करा..
Non-Creamy Layer, income proof OBC, OBC,
ओबीसींसाठी उत्पन्नाच्या दाखल्याची अट रद्द, शासन निर्णय काय सांगतो?
Residents on the master list will have to pay a lower rate for more area MHADA Vice Presidents decision
‘मास्टर लिस्ट’वरील रहिवाशांना ज्यादा क्षेत्रफळासाठी कमी दर मोजावा लागणार! म्हाडा उपाध्यक्षांचा निर्णय
aI policy in India
भारतात ‘एआय’ धोरण राबवण्यात कोणत्या राज्यांची आघाडी? कोणती राज्ये पिछाडीवर? महाराष्ट्र कुठे?
illegal migration in parts of Jharkhand
Bangladeshis marrying Jharkhand tribal women: बांगलादेशी नागरिक झारखंडच्या आदिवासी महिलांशी लग्न करतायत? भाजपाच्या दाव्याला केंद्रीय गृहखात्याची चपराक
loksatta analysis, Jayakwadi Dam water use
विश्लेषण : जायकवाडी भरूनही मराठवाड्याला फायदा काय? समन्यायी पाणीवाटपाचा मुद्दा अजूनही का अनुत्तरित?

योजना संचालनालयाच्या संचालक महेश पालकर यांनी निकालाची माहिती दिली. केंद्र सरकार पुरस्कृत नवभारत साक्षरता अभियानाची राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या योजना संचालनालयामार्फत अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अंतर्गत १७ मार्च रोजी राज्यभरात नवसाक्षरांचे पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान तपासण्यासाठी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी ६ लाख ४१ हजार ८१६ नवसाक्षरांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या ४ लाख ५९ हजार ५३३ नवसाक्षरांपैकी ४ लाख २५ हजार ९०६ नवसाक्षर उत्तीर्ण झाले. तर ३३ हजार ६२७ नवसाक्षरांमध्ये सुधारणा आवश्यक असल्याचा शेरा देण्यात आला आहे. हा निकाल राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्थेच्या (एनआयओएस) संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला.

आणखी वाचा-बारामती मतदारसंघात आचारसंहिता भंगाच्या १५० हून अधिक तक्रारी!

परीक्षेसाठी सर्वाधिक नोंदणी झालेल्या जिल्ह्यांमध्ये जळगाव जिल्ह्यातून ४० हजार ७१०, गडचिरोली जिल्ह्यातून ३३ हजार ७८७, चंद्रपूर जिल्ह्यातून २६ हजार ७६९, अमरावती जिल्ह्यातून २५ हजार ३२०, नाशिक जिल्ह्यातून २५ हजार २१५, अकोला जिल्ह्यातून १९ हजार ७२६ नवसाक्षरांनी नोंदणी केली होती.