चांद्रमोहीम फत्ते करणारा भारत आंतरग्रहीय मोहिमांसाठी किती सक्षम आहे हे या मोहिमेद्वारे तपासले जाईल पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाचा वापर करून एखादे यान मंगळाच्या कक्षेत पोहचविणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. या तंत्रज्ञानाचा वापर पुढे इतर ग्रहांच्या अभ्यास मोहिमांसाठी करता येऊ शकतो. डीप स्पेस नेटवर्कच्या साह्याने अवकाशातील यानाला नियंत्रित करणे, तसेच डीप स्पेस नेटवर्कचा वापर करणे तब्बल दहा महिन्यांच्या प्रवासानंतर योग्यवेळी तात्पुरती बंद करण्यात आलेली यंत्रे पृथ्वीवरून पुन्हा योग्यवेळी चालू करणे. हे तंत्रज्ञानदेखील पुढील आंतरग्रहीय मोहिमांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे समजले जाते. मंगळाच्या वातावरणाचा योग्य अभ्यास करणे आणि इतर देशांच्या मोहिमांतून सुटलेल्या काही मु्द्द्यांचा अभ्यास करणे. मंगळावरील पाणी व कार्बन डायऑक्साईड -हासाची कारणे शोधणे.