नवी दिल्ली : अतोनात हिंसा आणि अमानुष पुरुषी प्रवृत्तीचे समर्थन करणाऱ्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाविरोधात गुरुवारी संसदेतही सूर उमटले. या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असला तरी, त्याविरोधात गुरुवारी संसदेत काँग्रेसच्या महिला खासदार रंजिता रंजन यांनी हल्लाबोल केला. ‘माझ्या मुलीची मैत्रिण सिनेमा बघत असताना रडत-रडत बाहेर निघून गेली. महाविद्यालयीन मुलगी असह्य होऊन सिनेमा अध्र्यावर सोडून जात असेल तर हा सिनेमा महिलांबद्दल कोणती भावना ठेवतो हे स्पष्ट होते’, असा मुद्दा रंजन यांनी राज्यसभेत शून्य प्रहरात मांडला.

‘अ‍ॅनिमल वा कबीर सिंह यासारख्या चित्रपटांनी नकारात्मक भावनांचे, हिंसेचे, महिलांचा निकृष्ट दर्जाची वागणूक देण्याचे आणि त्यांचा अपमान करण्याचे बेभान समर्थन केले आहे. त्या विरोधात भूमिका घेण्याची गरज आहे’, असे रंजिता रंजन म्हणाल्या. अ‍ॅनिमल किंवा कबीर सिंह अशा चित्रपटांना सेन्सॉर बोर्ड प्रोत्साहन कसे देऊ शकते, असा प्रश्न रंजन यांनी उपस्थित केला.

compromise between the producers and the censor board regarding the release of the emergency film mumbai news
‘इमर्जन्सी’ चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होणार; निर्माते- सेन्सॉर मंडळातील तडजोडीनंतर प्रकरण उच्च न्यायालयाकडून निकाली
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Emergency, Kangana Ranaut, Censor Board,
‘इमर्जन्सी’ चित्रपटातील दृश्यांना कात्री लावण्यास सहनिर्माती कंगना राणावत तयार, सेन्सॉर मंडळाची उच्च न्यायालयात माहिती
devara public review
Devara Public Review: प्रेक्षकांना कसा वाटला ‘देवरा: पार्ट १’चित्रपट? प्रतिक्रिया देत म्हणाले, “दिग्दर्शन खूपच….”
Dharmaveer movie shiv sena hindutva
शिवसेनेतील बंडाचे कारण केवळ हिंदुत्व, ‘धर्मवीर’ मध्ये हेच अधोरेखित
Dombivli, communal tension in Dombivli,
डोंबिवलीत जातीय तेढ निर्माण करणाऱ्या दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल
What Raj Thackeray Said?
Raj Thackeray : “शिवसेनेतल्या राजकारणाला कंटाळून मी…”, राज ठाकरेंनी सांगितला २४ वर्षांपूर्वीचा किस्सा
mns protest against pakistani actor film the legend of maula jatt in nashik
पाकिस्तानी अभिनेत्याच्या चित्रपटाविरोधात मनसेचे आंदोलन

हेही वाचा >>>वादळग्रस्त तमिळनाडूला ४५० कोटींचा दुसरा हप्ता; मदतीचा दुसरा हप्ता देण्याचे पंतप्रधानांचे निर्देश : राजनाथ

धार्मिक भावनाही दुखावल्या!

अ‍ॅनिमलमध्ये ‘अर्जुन वेल्ली ने जोर के.. ’ हे गाणे असून त्याचा संदर्भ हरिसिंह नलवा यांच्याशी आहे. गुरु गोविंद सिंह यांनी मोघलांविरोधात संघर्ष केला, तेव्हा हरीसिंह नलवा सेनापती होते. या गाण्यामुळे  शीखांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न झाला असल्याची टीका रंजिता रंजन यांनी केली.