नवी दिल्ली : राज्य सरकार तसेच विविध राजकीय पक्षांनी केलेली मागणी मान्य करून, पंजाबमध्ये एकाच टप्प्यात होणारी निवडणूक गुरू रविदास जयंतीच्या कारणास्तव १४ फेब्रुवारीऐवजी २० फेब्रुवारीला घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने सोमवारी घेतला.

गुरू रविदास यांची जयंती साजरी करण्यासाठी त्यांचे लाखो अनुयायी १६ फेब्रुवारीला उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे जाणार असल्याने ते १४ फेब्रुवारीला मतदानाचा हक्क बजावू शकणार नाहीत हे लक्षात घेऊन मतदानाची तारीख पुढे ढकलावी, असे आवाहन पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी, भाजप व त्याचे मित्रपक्ष, बसप व इतर संघटनांनी निवडणूक आयोगाला केली होती. त्यानुसार, ही निवडणूक आता २० फेब्रुवारीला होईल, असे आयोगाने एका निवेदनात सांगितले. ही तारीख उत्तर प्रदेशातील तिसऱ्या टप्प्याशी जुळणारी आहे.

License, final vehicle test,
मुंबई : लोकसभा निवडणुकीमुळे अनुज्ञप्ती, अंतिम वाहन चाचणी बंद; २० मेनंतर उमेदवारांची चाचणी होणार
Madhya Pradesh Chief Minister Mohan Yadav Congress PM Modi Constitution
संपत्ती हिसकावून घेऊन ती घुसखोरांमध्ये वाटण्याचा काँग्रेसचा कट; मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा दावा
bank late night opening, bank late night opening before polling day, baramati lok sabha seat, bhandara gondia lok sabha seat, bhandara gondia lok sabha By elections, marathi news, bhandara gondia news, marathi news,
बँका उघडण्याचा मुद्दा… भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीचे स्मरण
What percentage of voting was done in Baramati Constituency till three o clock
Loksabha Poll 2024 : तिसऱ्या टप्प्यात ६१.४५ टक्के नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क; सर्वाधिक मतदान आसाममध्ये, तर महाराष्ट्रात…
voter turnout in the first two phases in maharashtra
Lok Sabha Election 2024 : पहिल्या दोन टप्प्यांत राज्यात गेल्या वेळीइतकेच मतदान
akola lok sabha marathi news
लोकसभेच्या प्रचारात विधानसभेच्या इच्छुकांची धडपड
mohan bhagwat
“मतदान हा केवळ आपला अधिकार नसून…”, RSS प्रमुख मोहन भागवतांनी नागपुरात बजावला हक्क
odisha assembly elections BJD chief Naveen Patnaik chosen to contest from two seats
ओडिशाचे मुख्यमंत्री दोन जागांवर लढवणार निवडणूक; काय आहेत डावपेच?

निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुका तसेच पोटनिवडणुकांच्या तारखा बदलण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या असल्याचे आयोगातील सूत्रांनी सांगितले. ऑक्टोबर २०१३ मध्ये मिझोराममध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या काही तारखा आयोगाने बदलून नोव्हेंबरमध्ये केल्या होत्या. एप्रिल २०१४ मध्ये मिझोराममधील एका पोटनिवडणुकीचे वेळापत्रक बदलण्यात आले होते, तसेच अशाच कारणांसाठी मार्च २०१२ मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याची तारीखही बदलण्यात आली होती.

राजकीय पक्षांकडून स्वागत 

निवडणुकीची तारीख बदलल्यामुळे गुरू रविदास यांच्या अनुयायांना वाराणसी येथे कार्यक्रमाला जाणे शक्य होईल, असे सांगून पंजाबमधील राजकीय पक्षांनी आयोगाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी, शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल, पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू, भाजपचे नेते सोम प्रकाश व आम आदमी पक्षाचे वरिष्ठ नेते हरपालसिंग चीमा यांनी हा निर्णय स्वागतार्ह असल्याचे म्हटले आहे.