Raghuram Rajan in Bharat Jodo Yatra: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी आज राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेमध्ये सहभाग घेतला. राजस्थानमध्ये राहुल गांधींची ही यात्रा पोहोचलेली असता राजन काही अंतर या यात्रेमध्ये राहुल गांधींबरोबर चालले. राजस्थानमधील सवाई माधवपूर येथील भदोईमधून राहुल गांधींच्या आजच्या भारत जोडो यात्रेला सुरुवात झाली.

“भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधींबरोबर चालताना आरबीआय़चे माजी गव्हर्नर रघुराम राजन”, अशा कॅप्शनसहीत राहुल गांधी आणि रघुराम राजन यांचा फोटो काँग्रेसच्या ट्वीटर हॅण्डलवरुन शेअर करण्यात आला आहे. “नफरत के खिलाफ देश जोड़ने के लिए खड़े होने वालों की बढ़ती संख्या बताती है कि- हम होंगे कामयाब,” असंही हा फोटो शेअर करताना म्हटलं आहे.

pension for government employees
लेख : सामाजिक कल्याणाकडे दुर्लक्ष
https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/04/cats_ee077e.jpg
“हा नवा भारत आहे, घुसून मारतो”, योगींचं वक्तव्य चर्चेत; म्हणाले, “आता फटाके फुटले तरी…”
Gaurav Gogoi alleges that BJP wants a Russian-style oligarchy
“रामाच्या नावाचा वापर ही लांच्छनास्पद बाब; भाजपाला रशियासारखीच अल्पाधिकारशाही हवीय”; काँग्रेस नेते गौरव गोगोईंचा भाजपावर आरोप
In Raigad farmers will not be treated unfairly says Uday Samant
रायगडमध्ये शेतकऱ्यांवर अन्याय होणारा निर्णय घेणार नाही, उरणमधील महायुतीच्या सभेत पालकमंत्र्यांची ग्वाही

रघुराम राजन यांनी यापूर्वी अनेकदा केंद्रातील मोदी सरकारच्या आर्थिक आणि सामाजिक धोरणांवर टीका केलेली आहे. भारताचा विकास हा मुक्त लोकशाहीला अधिक पाठबळ देण्यामध्ये आणि आर्थिक विकासासाठी आवश्यक असलेल्या संस्थांना सामर्थ्यवान बनवण्यामध्ये आहे, असं राजन सांगतात. राजन हे मोदी सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयावर उघडपणे टीका करणाऱ्या प्रमुख तज्ज्ञांपैकी एक आहेत. “आर्थिक विकास मंदावण्यासाठी हा राजकीय आणि सामाजिक अजेंडा” कारणीभूत ठरला असं राजन यांनी यापूर्वी म्हटलं आहे. यावरुन भारतीय जनता पार्टीने कठोर शब्दांमध्ये प्रतिक्रिया नोंदवलेली.

रघुराम राजन यांनी भारत जोडो यात्रेला हजेरी लावणं हे अनेकांना आश्चर्याचकित करणारं ठरलं नाही. या यात्रेच्या माध्यमातून काँग्रेस समविचारी व्यक्तींना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील समविचारी व्यक्तींना ‘देश एकत्र करण्यासाठी’ एकत्र आणण्याचा हा प्रयत्न असल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे.