राजस्थानमधील चुरू आणि अलवार येथील भाषणामध्ये काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार भारतीय जनता पक्षाने राजस्थानच्या मुख्य निवडणुक अधिकाऱयाकडे केली आहे.
भाजपचे उपाध्यक्ष ओंकारसिंग लखावत यांच्या नेतृत्वाखाली एक निवेदन निवडणूक आयोगाकडे देण्यात आले आहे. यात राहुल गांधी यांची चुरू आणि अलवार येथील भाषणे जातीयता पसरविणारी व प्रक्षोभक असल्याचा आरोप केला आहे.
तसेच “राहुल गांधी यांनी समाजात आणखी दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर आणि गुजरातमधील हिंसाचाराबद्दल भाजपवर आरोप केले आहेत” असेही तक्रारीत म्हटले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 25th Oct 2013 रोजी प्रकाशित
राहुल गांधींनी आचारसंहितेचा भंग केला- भाजप
राजस्थानमधील चुरू आणि अलवार येथील भाषणामध्ये काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार भारतीय जनता पक्षाने राजस्थानच्या मुख्य निवडणुक अधिकाऱयाकडे केली आहे.

First published on: 25-10-2013 at 12:44 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi breaks the code of conduct bjp