“मी वाराणसीत गेलो होतो. रात्रीची वेळ होती. तिथे बाजा वाजताना मी पाहिला. बाजाच्या संगीतावर युपीचं भविष्य रस्त्यात नाचताना मी वाराणसीत बघितलं”, अशी टीका राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. या टीकेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. आज वाराणसीमध्ये अमूल प्लांट कॉम्प्लेक्समध्ये १३ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या ३५ प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. त्यावेळी ते बोलत होते.

पंतप्रधान म्हणाले, “राहुल गांधींनी मोदींना शिव्या देत दोन दशके घालवली, पण आता देवासारखे लोक असलेल्या उत्तर प्रदेशातील तरुणांविरोधात ते बोलत आहेत. जे स्वतः नशेत आहेत ते उत्तर प्रदेश आणि माझ्या काशीच्या मुलांना नशाखोर म्हणत आहेत. अहो अतिपरिवारवादी, काशीचा तरुण उत्तर प्रदेशच्या विकासात व्यस्त आहे, तो आपले समृद्ध भविष्य लिहिण्यासाठी सर्वतोपरी मेहनत करत आहे. इंडिया आघाडीने उत्तर प्रदेशातील तरुणांचा केलेला अपमान कोणीही विसरू शकणार नाही.”

Narendra Modi statement that the people of Kashmir are waiting for a terror free government print politics news
काश्मिरी जनतेला दहशतवादमुक्त सरकारची प्रतीक्षा – मोदी
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Sharad Pawars big statement about increasing oppression of women
महिलांवरील वाढत्या अत्याचाराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…
Jagan Mohan reddy
Tirupati Laddu Row : “…तर दूरगामी परिणाम होतील”, लाडूप्रकरणावरून जगनमोहन रेड्डींनी पंतप्रधानांना पत्र लिहित व्यक्त केली भीती
farmer leader raju shetty slam bjp over corruption issues in buldhana
राजू शेट्टी म्हणाले; महाराष्ट्र भाजपला आंदण दिलेला नाही; काचेच्या घरात राहणाऱ्यांनी…या शेतकरी नेत्याने थेटच….
supriya sule on balasaheb thorat cm post statement
Supriya Sule : “राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल”, बाळासाहेब थोरातांच्या विधानावर सुप्रिया सुळेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाल्या…
Sanjay Rathod in Digras Assembly Constituency Vidhan Sabha Nivadnuk 2024
कारण राजकारण: दिग्रसमध्ये राठोड यांचा प्रचार भाजप करणार? ‘मविआ’कडून कोणाला उमदेवारी?
Controversial statement case High Court orders Thane Magistrate in case against Jitendra Awhad
वादग्रस्त वक्तव्याचे प्रकरण: जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा नोंदवण्याच्या मागणीचा पुनर्विचार करा,उच्च न्यायालयाचे ठाणे न्यायदंडाधिकाऱ्यांना आदेश

हेही वाचा >> पंतप्रधान मोदींच्या मतदारसंघात युवक मद्याच्या नशेत रस्त्यावर नाचताना पाहिले, राहुल गांधींची टीका

मोदी म्हणाले, “हे अतिपरिवारवाद्यांचे वास्तव आहे. कुटुंबातील सदस्यांना नेहमीच युवा शक्तीची भीती वाटते. तरुण प्रतिभांना घाबरतात. सामान्य तरुणाला संधी मिळाली तर ते सर्वत्र आव्हान देतील, असं त्यांना वाटतं. त्यांना तेच लोक आवडतात जे रात्रंदिवस त्यांचा जयजयकार करत असतात. काँग्रेस पक्षावर निंदा करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “परिवारवाद’, भ्रष्टाचार आणि तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे उत्तर प्रदेश अनेक दशकांपासून विकासात मागे राहिला आहे.”

आर्थिक महसत्ता बनेल

पंतप्रधान म्हणाले, “मोदींचा तिसरा कार्यकाळ हा संपूर्ण जगात भारताच्या सत्तेचा सर्वात महत्त्वाचा काळ असणार आहे. हा सर्वात तीव्र कार्यकाळ असणार आहे. यामध्ये भारतातील प्रत्येक आर्थिक, सामाजिक, सामरिक, सांस्कृतिक क्षेत्र नवीन उंची गाठेल. गेल्या दहा वर्षांत भारत ११ व्या क्रमांकावरून पाचवी आर्थिक शक्ती बनला आहे. येत्या पाच वर्षांत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक महासत्ता बनेल. तसंच, मी हमी दिली आहे की दुर्लक्षित असलेल्या पूर्व भारताला विकसित भारतासाठी प्रगतीचे इंजिन’ बनवतील, असंही ते म्हणाले.