भोपाळ, पीटीआय

भोपाळ: विरोधी इंडिया आघाडीचे नेते भ्रष्टाचाऱ्यांना वाचवण्यात गुंतले असून, देशाचा विकास रोखण्यासाठी धमकावत आहेत असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

Russia defence minister Andrei Belousov
रशिया- युक्रेन युद्धः लष्करी पार्श्वभूमी नसलेल्या नेत्याला पुतिन यांनी केले संरक्षणमंत्री, कारण काय?
Three independent MLAs from Haryana withdrew support from the BJP government
हरियाणात भाजपची धावाधाव; विरोधी आमदार संपर्कात, माजी मुख्यमंत्र्यांचा दावा
Pm Narendra Modi is a global leader elect Udayanraje Bhosale to give him strength says Devendra Fadnavis
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वैश्विक नेतृत्व, त्यांना ताकद देण्यासाठी उदयनराजेंना निवडून द्या- देवेंद्र फडणवीस
BJP, Sangli, minorities, Sangli latest news,
सांगली : भाजपकडून अल्पसंख्यांकांना विश्वास देण्याचे काम
Raj Thackeray
ट्रिपल इंजिन सरकारला मनसेच्या चौथ्या इंजिनाची गरज का भासली? राज ठाकरे म्हणाले, “त्यांना माझ्याकडून…”
Delhi Lieutenant Governor V K Saxena
राज्यपालांचा एक आदेश अन् महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांची हकालपट्टी! माजी अध्यक्षांवर केला गंभीर आरोप
sunita kejriwal request denied
अरविंद केजरीवाल यांना भेटण्यासाठी पत्नी सुनीता यांनी केलेला अर्ज फेटाळला? काय आहे नियम?
Sharad Pawar criticism that Narendra Modi has no moral right to demand the power of the country again
नरेंद्र मोदींना देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार नाही; शरद पवारांचा हल्लाबोल

मध्य प्रदेशातील बालघाट जिल्ह्यातील सभेत त्यांनी विरोधकांवर टीका केली. आगामी लोकसभा निवडणूक ही नव्या भारताच्या जडणघणीसाठी महत्त्वाची आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीला तिसऱ्यांदा सत्तेत येण्यासाठी जनतेने आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. देशाच्या सुरक्षेसाठी पंतप्रधान जेव्हा हमी देतात तेव्हा विरोधक संतप्त होतात. विकास आणखी वेगाने व्हायला हवा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा >>>भाजप – बिजद यांच्या मैत्रीपूर्ण संघर्षांत कुणाची सरशी?

विरोधकांकडून रामाचा अपमान

पिलिभीत: अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम रोखण्याचे काँग्रेसने अनेक प्रयत्न केले. तसेच प्राणप्रतिष्ठा सोहळय़ाचे निमंत्रण नाकारून त्यांनी रामाचा अपमान केला असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील प्रचारसभेत केला. जनतेने दिलेल्या मदतीतून भव्य राम मंदिर उभे राहिले तेव्हा काँग्रेसने प्राणप्रतिष्ठेचे आमंत्रण तर धुडकावलेच पण पक्षातील जी मंडळी समारंभाला उपस्थित राहिली त्यांना सहा वर्षांसाठी निलंबित केले. राम मंदिर उभारणीत दिवंगत मुख्यमंत्री कल्याणसिंह यांच्या योगदानाचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला. काँग्रेस तुष्टीकरणाच्या राजकारणातून बाहेर येऊ शकत नाही. काँग्रेसचा जाहीरनामा पाहता, तो मुस्लीम लीगचा आहे काय? असे वाटते असा टोला पंतप्रधानांनी लगावला.

काँग्रेस सरकारच्या काळात जगातून मदत मिळावी म्हणून आवाहन केले जायचे. करोनाकाळात जगासाठी भारताने औषधे उपलब्ध करून दिल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. देश बलवान होते तेव्हा जगाकडून दखल घेतली जाते ते पंतप्रधानांनी नमूद केले.