भारतीय नौदलाच्या आयएनएस विक्रमादित्य या युद्धनौकेवर वायुगळतीच्या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला. विक्रमादित्य युद्धनौकेचे करवार येथे देखभाल-दुरूस्तीचे काम सुरू असताना शुक्रवारी दुपारी पाच वाजता नौकेच्या सांडपाणी शुद्धीकरण प्लांटमध्ये वायुगळतीची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत दोन नौदल कर्मचाऱयांसह चार जण सापडले. चौघांनाही करवार येथील नौदलाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान राकेश कुमार आणि मोहनदास कोळंबकर या दोन कर्मचाऱयांचा मृत्यू झाला. तर उर्वरित दोघांवर उपचार सुरू आहेत.