मानदावली येथील शाळेतून तीन दिवसांपूर्वी अपहरण करण्यात आलेल्या दोन भावंडांचे मृतदेह शनिवारी येथील टिळक मार्गाजवळच्या जंगलात सापडल्याने एकच खळबळ उडाली आह़े  मानसीज आणि यशबी अशी या मुलांची नावे असून त्यांचे वय अनुक्रमे सात आणि पाच वष्रे होत़े  अपहरण झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना खंडणीचा दूरध्वनी आला होता़  त्यांच्या मृत्यूचे कारण शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच स्पष्ट होऊ शकणार आह़े