पीटीआय, नवी दिल्ली : ईशान्येकडील राज्यांमध्ये भाजपने मिळविलेल्या यशाचे श्रेय पक्षाची स्थानिक सरकारे, त्यांची कार्यशैली आणि कार्यकर्त्यांची समर्पण वृत्ती या ‘त्रिवेणी संगमा’ला जाते, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. निकालानंतर येथील पक्ष मुख्यालयामध्ये जल्लोष करण्यासाठी जमलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान बोलत होते.

त्रिपुरा, नागालँड आणि मेघायलमधील निकालांनी लोकशाही आणि लोकशाही प्रणालीवर असलेला विश्वास जगाला दाखवून दिला असल्याचे पंतप्रधान म्हणाले. ईशान्येकडील जनतेने दिलेला हा कौल म्हणजे तो प्रदेश दिल्ली आणि ‘दिल’ (हृदय) यापासून दुरावलेला नाही, हेच स्पष्ट करणारा असल्याची पुष्टीही पंतप्रधान मोदी यांनी जोडली.

former MLA Ulhas Pawar
अफवा पसरविण्यात रा. स्व. संघ वस्ताद; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
thane lok sabha marathi news, thane bjp sanjay kelkar marathi news
ठाण्यात भाजपच्या जुन्या-नव्यांमध्ये रस्सीखेच
Sanjay Singh
नितीश कुमारांचे बाहेर पडणे ‘इंडिया’ आघाडीसाठी मोठा धक्का? ‘आप’चे संजय सिंह म्हणाले…
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा

तर भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी पक्षाच्या यशाचे श्रेय पंतप्रधान मोदी यांना दिले. ईशान्येकडील राज्यांना मुख्य प्रवाहात आणून तेथे विकास घडवून आणण्यासाठी पंतप्रधानांनी केलेल्या कामामुळेच निवडणुकीत यश मिळाल्याचे नड्डा म्हणाले. काँग्रेसने ईशान्य भारताचा केवळ ‘एटीएम’सारखा वापर केला मात्र मोदी यांनी तो प्रदेश भ्रष्टाचारमुक्त, शांततमय आणि विकसित केला असेही ते म्हणाले.