काही महिन्यांपूर्वी तेव्हा काँग्रेसमध्ये असणारे पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी तडकाफडकी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि पंजाबमध्ये राजकीय भूकंप झाला. अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्याच्या आधीपासूनच नवज्योत सिंग सिद्धू यांच्या रुपानं काँग्रेसमध्ये वादळ उठलं होतंच. त्यात अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यामुळे तेल ओतलं गेलं. अखेर काँग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवलं होतं, असं स्पष्ट केलं आहे. तसेच, त्यांना का हटवण्यात आलं होतं, हे देखील राहुल गांधींनी सांगितलं आहे.

तो राजीनामा नव्हे, पक्षांतर्गत कारवाईच!

राहुल गांधींनी पंजाबच्या फतेगड साहिबमध्ये झालेल्या प्रचारसभेत बोलताना कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यावेळी नेमकं काय झालं होतं, याविषयी जाहीरपणे माहिती दिली आहे. सर्वात पहिली बाब म्हणजे कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिल्याचं आत्तापर्यंत सर्वश्रुत असताना राहुल गांधींनी त्यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्यात आल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे तो राजीनामा नसून ती पक्षांतर्गत कारवाई होती, असं आता स्पष्ट झालं आहे.

devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?
Tanaji Sawant News
तानाजी सावंतांचा अजित पवारांसमोरच मोठा इशारा; म्हणाले, “…तर आम्ही सहन करणार नाही”
What Kangana Said?
कंगना म्हणाली, “सुभाषचंद्र बोस देशाचे पहिले पंतप्रधान होते, त्यांना..”; व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले…
Sunita Kejriwal
अरविंद केजरीवालांचा तुरुंगातून संदेश; पत्नी सुनीता म्हणाल्या, “मुख्यमंत्र्यांनी आप आमदारांना आपापल्या मतदारसंघात…”

“या माणसाला डोक्याचा भाग नाही…”, सोनिया गांधींचा उल्लेख करत कॅप्टन अमरिंदर सिंग नवज्योत सिंग सिंद्धूंवर भडकले

काँग्रेसमधील कार्यपद्धतीवर आणि विशेषत: शीर्ष नेतृत्वावर टीका करत कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिल्याचं जाहीर केलं होतं. “पक्षात आपला वारंवार अपमान केला जात आहे”, असं तेव्हा अमरिंदर सिंग म्हणाले होते. यानंतर आता राहुल गांधींनी अमरिंदर सिंग यांना पदावरून का काढण्यात आलं, याचं कारण सांगितलं आहे.

“मी तुम्हाला सांगतो की कॅप्टन अमरिंदर सिंग यांना पंजाबच्या मुख्यमंत्रीपदावरून नेमकं का काढण्यात आलं होतं. त्यांना काढलं कारण ते लोकांना मोफत वीज पुरवायला तयार नव्हते. ते म्हणाले माझं वीज कंपन्यांशी काँट्रॅक्ट झालं आहे”, असा खुलासा राहुल गांधींनी केला आहे.