Lok Sabha Election 2024 Phase 5 Voting Updates : लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा महाराष्ट्रासह देशभरात पार पडतो आहे. महाराष्ट्रातला आजचा शेवटचा टप्पा आहे. भिवंडी, नाशिक, मुंबई यासह महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये आज मतदान प्रक्रिया पार पडते आहे. भिवंडीत सुरेश म्हात्रे अर्थात बाळ्यामामाला राष्ट्रवादीने तिकिट दिलं आहे. तर भाजपाने तिसऱ्यांदा कपिल पाटील यांना संधी दिली आहे. भिवंडीत दुहेरी लढत होईल असं वाटत असताना निलेश सांबरेंनी अपक्ष अर्ज दाखल केल्याने ही लढत तिहेरी झाली आहे.

कपिल पाटील तिसऱ्यांदा जिंकणार?

भाजपाने २०१४ आणि २०१९ अशा दोन्ही वेळेला कपिल पाटील यांना संधी दिली होती. ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. आता मोदींनी ४०० पारचा नारा दिल्यानंतर त्यांच्याकडे तिसऱ्यांदा निवडून येण्याची संधी आहे. असं झालं तर कपिल पाटील विजयाची हॅट्रीक साधू शकतात. भिवंडीकर आज कुणाला कौल देणार ते पाहणं महत्त्वाचं आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसनेही तुल्यबळ मतदार दिला आहे. भिवंडी हा विरोधकांच्या दृष्टीने विचार केल्यास काँग्रेसचा मतदारसंघ आहे. मात्र महाविकास आघाडीत सुरेश उर्फ बाळ्यामामाला राष्ट्रवादीने तिकिट दिलं आहे. त्यामुळे सुरेश म्हात्रे कपिल पाटील यांच्यासमोर आव्हान उभं करु शकतात.

bjp leader mayatai umate demand one woman candidate for assembly polls in wardha district
वर्धा : ‘भाऊराया, बहिणीस विधानसभेसाठी संधी द्या’  -नितीन गडकरींना बहिणीची विनवणी…
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
uddhav thackeray eknath shinde ladki bahin yojana
“भुऱ्या डोक्यावर पडलेला नाही हे त्यांनी लक्षात घ्यावं”, ठाकरे गटाचा शिंदे सरकारवर हल्लाबोल!
yogita chavan first reaction after eviction
“चुकीचे शब्द, लायकी काढणं…”, घराबाहेर आल्यावर योगिताची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली, “वर्षाताईंना खूप टार्गेट केलं”
Ajit Pawar Ladki Bahin News
Ajit Pawar : अजित पवारांनी आधी हात जोडले, मग डोक्यावर हात ठेवत लाडक्या बहिणीला म्हणाले, “व्वा गं माझी मैना”
Bigg Boss Marathi 5
Video: जान्हवी किल्लेकरच्या ‘त्या’ कृतीवर घरातील सदस्यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “मीठ-मसाला….”
yugendra pawar contest assembly polls from baramati constituency against ajit pawar
मोठी बातमी : विधानसभेला बारामतीत अजित पवार आणि युगेंद्र पवारांमध्ये लढत होणार
bigg boss marathi season 5 akshay kumar riteish deshmukh dance on zapuk zupuk song
भाऊच्या धक्क्यावर अक्षय कुमारची एन्ट्री! ‘झापुक झुपूक…’ म्हणत सूरजसह धरला ठेका, तर वर्षा उसगांवकरांना म्हणाला…

हे पण वाचा- राज्यातील अखेरच्या टप्प्यात कुणाची बाजी?

सुरेश म्हात्रेंचा सातवेळा पक्षबदल

कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदींना तर सुरेश म्हात्रेंच्या प्रचारासाठी शरद पवारांना उतरावं लागलं. सुरेश म्हात्रेंच्या पक्षनिष्ठेविषयी आणि स्थैर्याविषयी भिवंडीकरांच्या मनात संभ्रम आहे. कारण मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अशा जवळपास सगळ्या पक्षांमधून ते फिरुन राष्ट्रवादीत स्थिरावले आहेत. शिवसैनिक म्हणून त्यांनी राजकारणाची सुरुवात केली होती. भिवंडीतल्या यंत्रमाग कामगारांबाबत त्यांनी आवाज उठवण्याचं काम केलं, तसंच शिवसेनेत एक वजन निर्माण केलं. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी बाळ्या मामा अर्थात सुरेश म्हात्रेंनी मनसेत प्रवेश केला. मात्र कपिल पाटील यांनी त्यांना २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत हरवलं. ज्यानंतर त्यांनी पुन्हा मनसेला सोडचिठ्ठी दिली आणि शिवसेनेत प्रवेश केला. सुरेश म्हात्रे यांनी २०१४ ते २०२४ या काळात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदे गट, मनसे आणि शेवटी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस असे सातवेळा पक्ष बदलले आहेत. कपिल पाटील यांचा कट्टर प्रतिस्पर्धी ही त्यांची ओळख आहे. आता सातवेळा पक्ष बदलेल्या सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामांना भिवंडीकर कौल देणार का हे आता आज ठरणार आहे.

हे पण वाचा- भिवंडीतील एमआयएमच्या उमेदवाराची माघार; एमआयएमच्या एका गटाचा बाळ्या मामा तर दुसऱ्या गटाचा निलेश सांबरे यांना पाठिंबा

निलेश सांबरेंचंही या दोघांना आव्हान

भिवंडीतला तिसरा चेहरा आहे निलेश सांबरेंचा. विरोधकांवर टीका करण्यापेक्षा त्यांनी आधी केलेलं सामाजिक काम लोकांना पटवून देत त्याचपद्धतीचं काम निवडून आल्यानंतर व्यापक स्वरूपात मतदार संघात करण्याचा विश्वास जनतेत निर्माण करण्यावर त्यांनी भर दिला. गाव-पाडे, वाड्या-वस्त्या या ठिकाणी त्यांचं काम गेली अनेक वर्ष जिजाऊ संस्था आणि संघटनेच्या माध्यमातून सर्वसामन्यां जनतेपर्यंत पोहचलं होतं. कधीही विद्यामान खासदार पोहचले नव्हते अशा गावात सांबरे यांनी स्वत: भेटी दिल्यानं ग्रामस्थांना एक वेगळाच आनंद झाला होता. त्यामुळे आपोआपच प्रत्येक माणूस त्यांच्या प्रचारात जिजाऊ संस्थेसह जोडला गेल्याचं पाहायला मिळालं. आता भिवंडीकर नेमकं कुणाला मतदान करुन लोकसभेत जाण्याची संधी देतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.