जुलै २०२२ मध्ये, ‘भारतात, दूरसंचारक्षेत्र नियंत्रित करण्यासाठी नवीन कायदेशीर चौकटीची गरज’ या विषयावर एक विचार विनिमय पत्रिका प्रकाशित करण्यात आली होती आणि त्यावर टिप्पण्या, सूचना मागवण्यात आल्या होत्या. विविध हितसंबंधित आणि उद्योग संघटनांकडून यावर टिप्पण्या, सूचना प्राप्त झाल्या आहेत. या सूचना टिपण्ण्या आणि विचारविमर्शाच्या आधारे, मंत्रालयाने आता भारतीय दूरसंचार विधेयक- २०२२ चा मसुदा तयार केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्याद्वारे सरकार भारतातील दूरसंचार नियंत्रित करणारी विद्यमान कायदेशीर चौकट बदलू इच्छित आहे. सरकारला भारतीय टेलिग्राफ कायदा -१८८५, वायरलेस टेलिग्राफी कायदा-१९३३ आणि टेलिग्राफ वायर (बेकायदेशीर ताबा) कायदा- १९५० एका नवीन विधेयकाद्वारे एकत्रित करायचे आहे. २१व्या शतकातील वास्तवाला अनुसरून दूरसंचार क्षेत्रासाठी भारताला नवीन कायदेशीर चौकटीची गरज असल्याचे केंद्राचे मत आहे. प्रस्तावित विधेयकाच्या स्पष्टीकरणात्मक नोटमध्ये, त्याला ‘भारतीय दूरसंचार विधेयक – २०२२ ’ असे नाव देण्यात आले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained indian telecom bill 2022 what exactly is the purpose msr
First published on: 23-09-2022 at 16:04 IST