भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान मिग-२१ बायसन हे २८ जुलैच्या रात्री राजस्थानमधील बारमेर येथे कोसळले. या अपघातात विंग कमांडर मोहित राणा आणि फ्लाइट लेफ्टनंट अनिकाश बल शहीद झाले. वायुसेनेचे हे दोन्ही शिकाऊ वैमानिक राजस्थानमधील उत्तरलाई एअरबेसवरून उड्डाणाचे प्रशिक्षण घेत होते. प्रशिक्षणादरम्यान झालेल्या विमान अपघातात हे दोन वैमानिक शहीद झाले आहेत. गेल्या २० महिन्यांमध्ये ६ वेळा MiG-21 लढाऊ विमानांचा अपघात झाल्याचे समोर आले आहे. या अपघातानंतरही वायू सेनेत या लढाऊ विमानांचा वापर करण्यात येतो. मात्र, MiG-21 लढाऊ विमानांचा सारखा अपघात का होत आहे? आणि अपघातानंतरही वायू सेनेत या विमानांचा वापर का केला जातोय? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिग-२१ लढाऊ विमानांबद्दल महत्वाच्या गोष्टी

हे विमान १९५५ च्या सुमारास एस.च्या मिकोयन कंपनीने तयार केले होते. १९६३ मध्ये ते भारतीय हवाई दलात सामील झाले. भारताने एकूण ८७४ मिग-२१ विमाने आपल्या ताफ्यात समाविष्ट केली होती. सध्या हवाई दल आपली अपग्रेडेड आवृत्ती मिग-२१ बायसन वापरते. भारताचे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) हे विमान परवाना अंतर्गत अपग्रेड करते. मात्र, या विमानांचा अनेकदा अपघात झाला अजून कित्येक वैमानिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामुळेच जवळपास ६ दशके जुन्या या विमानांच्या वापराबाबत अनेकदा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

हेही वाचा- विश्लेषण : करोना काळात घटलेले मुलांचे लसीकरण किती चिंताजनक?

मिग सीरीजची लढाऊ विमाने गेल्या ५० वर्षांपासून भारतीय हवाई दलाचा कणा आहेत. १९६३ पासून भारतीय हवाई दलाला ८५० हून अधिक मिग लढाऊ विमाने मिळाली आहेत. एवढेच नाही तर १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्ध, नंतर १९७१ चे युद्ध आणि त्यानंतर १९९९ च्या कारगिल युद्धात या विमानांनी देशासाठी निर्णायक भूमिका बजावली आहे.

या विमानांचे वय ५० वर्षांपेक्षा जास्त असले तरी आजही अपग्रेडेड मिग-२१ विमान आकाशातील कोणत्याही आधुनिक विमानाशी स्पर्धा करू शकते. याचा पुरावा संपूर्ण जगाने २०१९ मध्ये पाहिला आहे, जेव्हा भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी पाकिस्तानचे पाचव्या पिढीचे आधुनिक विमान एफ-१६ मिग-२१ बायसनमधून खाली पाडले होते. थोडक्यात, या मिग सीरिजच्या विमानांची (MIG-21) लढण्याची क्षमता आजही अबाधित आहे आणि ती अतुलनीय आहे पण सुरक्षिततेच्या दृष्टीने या विमानांचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही. काही आकडेवारीवरूनही हे समजू शकते.

आतापर्यंत निम्मी विमाने कोसळली आहेत

२०१२ पर्यंत, भारताच्या ८७२ मिग विमानांच्या ताफ्यातील जवळपास निम्म्या विमानांचा अपघात झाला होता. २००३ ते २०१३ या कालावधीत म्हणजेच १० वर्षात ३८ मिग-२१ विमाने कोसळली. आजपासून गेल्या १० वर्षांचा विचार केला तर या काळात २१ मिग २१ विमानेही कोसळली. महत्त्वाची बाब म्हणजे १९७० पासून आजपर्यंत भारतीय हवाई दलाचे १८० हून अधिक वैमानिक मिग विमानाच्या उड्डाणादरम्यान शहीद झाले आहेत. याशिवाय या अपघातांमध्ये ४० नागरिकांनाही आपला जीव गमवावा लागला आहे. मिग सीरिजच्या विमानांच्या अपघातामागे पाच कारणे असल्याचे मानले जात आहे.

हेही वाचा- विश्लेषण : ‘बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया’ म्हणजेच BGMI वर बंदी का घालण्यात आली?

या ५ कारणांमुळे अपघात वाढत आहेत

पहिले कारण – मिग सीरिजच्या विमानांची ताकद (MIG-21) ही त्यांची सर्वात मोठी कमजोरी आहे. आकाशात, ही विमाने ताशी २५०० किलोमीटर वेगाने उड्डाण करू शकतात, ज्यामुळे ते सर्वात वेगवान लढाऊ विमानांच्या श्रेणीत येते. याशिवाय, लँडिंगच्या वेळीही मिग विमानांचा वेग सुमारे ३५० किलोमीटर प्रति तास असतो, जो खूप जास्त आहे. या वेगामुळे हे विमान चालवणे खूप कठीण होऊन अपघात होण्याची शक्यता वाढते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

दुसरे कारण म्हणजे या मालिकेच्या विमानाची रचना. वास्तविक तज्ञांचे म्हणणे आहे, की या विमानाची छत आकाराने खूपच लहान आहे. कॅनोपी हा प्रत्यक्षात विमानाचा भाग आहे जिथे पायलट बसून विमान चालवतो. या भागाचा आकार लहान असल्याने अनेक वेळा पायलटला धावपट्टी पाहता येत नसल्याचे सांगण्यात येते. अशा परिस्थितीत विमानाचा वेग खूप जास्त असल्याने. कदाचित त्यामुळेही अनेक अपघात होतात.

तिसरे कारण म्हणजे या विमानांचे दीर्घायुष्य. भारताला मिंग मालिकेतील पहिले विमान १९६३ मध्ये मिळाले होते. परंतु अनेक दशकांनंतरही ही विमाने भारतीय हवाई दलात सेवा देत आहेत. अनेक मिग विमाने (MIG-21) आहेत जी निवृत्त झाली आहेत आणि आज संग्रहालय आणि ढाब्यांची शोभा वाढवत आहेत. असेच एक मिग-२१ विमान हरियाणातील रोहतक येथील ढाब्याच्या बाहेर उभे आहे.

चौथे कारण म्हणजे मिग विमाने बनवणारा रशिया देखील १९९० सालापासून त्यांची निर्मिती करत नाही. त्यामुळे ही विमाने सेवेत ठेवण्यासाठी भारताला त्यांचे सुटे भाग इस्रायल आणि इतर देशांकडून घ्यावे लागतात. अशा परिस्थितीत इतर कंपन्यांचे सुटे भाग वापरल्याने अपघात होण्याची शक्यताही वाढते.

शेवटचे कारण म्हणजे मिग सीरीजची विमाने हे सिंगल-इंजिन लढाऊ विमाने आहेत. त्यामुळे जेव्हा उड्डाण करताना इंजिनमध्ये बिघाड होतो, तेव्हा त्याला सपोर्ट करण्यासाठी विमानात दुसरे इंजिन नसते आणि त्यामुळेच अपघात टाळणे कठीण होते.

हेही वाचा- विश्लेषण : स्वदेशी विमानवाहू युद्धनौकेने काय साधणार? आयएनएस विक्रांतचे महत्त्व काय?

भारतीय हवाई दलासाठी मिग-२१ का आवश्यक आहे?
तथापि, आज ५०-६० वर्षे जुनी मिग फायटर एअरक्राफ्ट (MIG-21) भारतीय हवाई दलात का सेवा देत आहेत हे समजून घेणे देखील आवश्यक आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे लाल फिती. वास्तविक, मिग विमानांचा ताफा भारतातच विकसित होत असलेल्या तेजस विमानांनी बदलला जाणार होता. पण हे विमान विकसित करण्यात अनेक दशकांचा विलंब झाला. भारतीय हवाई दलाला सध्या ४२ स्क्वाड्रनची गरज आहे. एका स्क्वाड्रनमध्ये १८ लढाऊ विमाने असतात. टू फ्रंट वॉर म्हणजे भारताने पाकिस्तान आणि चीन या दोन्ही देशांशी एकाच वेळी युद्ध केले तर त्याला ४२ स्क्वाड्रनची गरज भासेल. म्हणजेच किमान ७५६ विमानांची गरज भासेल. पण तरीही आपण या संख्येत मागे आहोत.

या सर्व परिस्थिती लक्षात घेता, भारताने फ्लाय अवे कंडिशनमध्ये फ्रान्सकडून राफेलच्या २ स्क्वाड्रन्स खरेदी केल्या आहेत. फ्लाय अवे कंडिशन म्हणजे विमान पूर्णपणे तयार आहे आणि त्याचा वापर लगेच सुरू होऊ शकतो.

चीन-पाकिस्तानला भिडण्याची भारताची तयारी
३६ राफेल विमानांशिवाय भारताला 40 तेजस विमानेही मिळणार आहेत. तथापि, असे असूनही, या वर्षापर्यंत भारतीय लष्कराकडे केवळ २९ स्क्वॉड्रन्स उपलब्ध होतील, असा अंदाज आहे. तर दोन आघाडीच्या युद्धासाठी ४२ स्क्वाड्रन्सची आवश्यकता असेल. सध्या भारतीय हवाई दलाकडे मिग-२१ विमानांचे चार स्क्वाड्रन आहेत. जे श्रीनगर, उत्तरलाई, सुरतगड आणि नल येथे तैनात आहेत. येत्या तीन वर्षांत निवृत्त होण्याचे लक्ष्य त्यांना ठेवण्यात आले आहे. म्हणजेच २०२५ पर्यंत सर्व मिग-२१ विमाने हवाई दलातून निवृत्त होतील.

सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या वर्षी सप्टेंबरमध्ये श्रीनगर एअरबेसवर तैनात असलेले मिग-२१ विमानांचे स्क्वाड्रन निवृत्त होणार आहे. या सर्व स्क्वाड्रन्सने मिग-२१ च्या बायसन विमानांना अपग्रेड केले आहे. मोठी गोष्ट म्हणजे सध्याच्या अपघातात आपल्या देशाने आपले दोन शूर हवाई सैनिक गमावले आहेत. त्यापैकी विंग कमांडर मोहित राणा हिमाचल प्रदेशातील मंडी येथील रहिवासी होते. डिसेंबर २००५ मध्ये ते भारतीय हवाई दलात दाखल झाले आणि त्यांच्या स्क्वाड्रनचे फ्लाइट कमांडरही होते. मोहित राणा हे अत्यंत अनुभवी आणि कुशल वैमानिक मानले जात होते. कोणत्याही प्रकारच्या विचित्र परिस्थितीत विमाने सहजतेने हाताळण्यात ते तज्ञ मानले जात होते. त्याचप्रमाणे फ्लाइट लेफ्टनंट अनिकाश बल हे जम्मूचे रहिवासी होते आणि त्यांचे वय अवघे २६ वर्षे होते.

वैमानिक गमावणे हवाई दलासाठी अधिक क्लेशदायक
कोणत्याही देशाच्या हवाई दलासाठी तेथील वैमानिक हे फायटर जेट्सपेक्षा जास्त मौल्यवान असतात कारण फायटर वैमानिक तयार करण्यासाठी वर्षानुवर्षे मेहनत आणि करोडो रुपये खर्च करावे लागतात. हे अमेरिकेच्या उदाहरणावरून समजू शकते. अमेरिकन हवाई दल वैमानिक तयार करण्यासाठी ४५ ते ८७ कोटी रुपये खर्च करते. त्याचप्रमाणे, भारतीय हवाई दलातील लढाऊ वैमानिकाला पहिली दोन वर्षे कठोर प्रशिक्षण घ्यावे लागते आणि त्यानंतर त्याला आणखी दोन वर्षे फ्लाइट ट्रेनिंग ऑब्झर्व्हेशनमध्ये ठेवले जाते. म्हणजेच वैमानिक गमावणे म्हणजे हवाई दलाची ताकद कमी होणे. याशिवाय अशा अपघातांमुळे हवाई दलातील जवानांच्या मनोधैर्यावरही खोलवर परिणाम होतो आणि शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या हानीचा हिशोब देता येत नाही.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mig 21 crash know about strength and weakness of this fighter plane dpj
First published on: 30-07-2022 at 18:36 IST